Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेडोंबिवलीत नालेसफाई झालीच नाही

डोंबिवलीत नालेसफाई झालीच नाही

नागरिक प्रशासनावर प्रचंड नाराज

डोंबिवली (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ३१ मेपर्यंत ८० टक्के नाले साफ करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात ५० टक्के नाफेसफाई झाली नसल्याचे चित्र दिसत आहे. डोंबिवलीकरांनी याबाबत पालिका प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पालिका आयुक्तांनी डोंबिवलीतील नाल्यांची पाहणी करून सत्य परिस्थिती पाहावी अशी मागणी काही डोंबिबलीकर करीत आहेत.

डोंबिवलीतील अनेक मोठ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, कागद आणि कचरा साठल्याचे दिसून येत आहे. मोठे नाले पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर साफ करण्याचे निर्देश दिले असतानाही त्याउलट नालेसफाई झालीच नसल्याची पोलखोल नागरिकांनी केली आहे. हवामान खात्याने यावर्षी १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिह्यात ६० टक्के पाऊस पडला तरी पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे सिद्ध झाले असून त्यासाठी नालेसफाई न होणे हेच कारण असल्याचे मनीषा राणे यांनी सांगितले.

पालिका हद्दीतील मोठे नाले कर्मचारी वर्गाकडून तर छोटे नाले ठेकेदार पद्धतीने साफ केले जातात. त्यात साडेतीन कोटी पालिका तिजोरीतून खर्च होत आहेत. मात्र करदात्यांचा पैसा वाया जात असून नालेसफाई होत नसेल तर प्रशासनाला हा पैसा नाल्यात कुठे वाहत गेला याचे उत्तर द्यावे लागेल असे राणे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -