Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडी‘पालिका सांगेल त्याच रुग्णालयात दाखल व्हावे लागणार’

‘पालिका सांगेल त्याच रुग्णालयात दाखल व्हावे लागणार’

मुंबई  : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णसंख्येने दैनंदिन २० हजारांचा टप्पा पार केला आहे. २० ते ३० टक्के रुग्णसंख्या नियमीत वाढत असून रुग्णांना तत्काळ उपचार देणे गरजेचे आहे. त्यामुळे ठराविक रुग्णालयात दाखल करा, अशी रुग्णांची मागणी आता पालिका ऐकणार नसून पालिका सांगणार त्याच रुग्णालयात रुग्णांना दाखल व्हावे लागणार आहे. बाधित रुग्णावर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी पालिका पाठवेल त्याच रुग्णालयात रुग्णाला दाखल व्हावे लागणार आहे.

सध्याची कोरोना रुग्णसंख्या पाहता गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी कोरोनाची तीव्रता जास्त असल्याचे दिसून येत असून दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेचा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे रुग्णांवर आधी उपचार करणे गरजेचे आहे.
पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून रुग्णांना संपर्कात ठेवले जाणार असून त्यांच्याद्वारे दाखल केले जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर रुग्णांवर वेळीच उपचार व्हावे यासाठी ३५ हजारांहून अधिक खाटा पालिकेने तैनात ठेवल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -