मुंबई : “नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवले” असे म्हणत भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मुंबई तुंबण्याच्या मुद्यावरून शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले , मुंबईला तुंबवून दाखवलं…
आता शिवसेनेने @mybmc तून देखील तोंड काळे करण्याची तयारी ठेवावी… https://t.co/SCiP9ecryh
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 5, 2022
मुंबईमध्ये पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत येत्या शुक्रवारपर्यंत ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. येत्या ५ दिवसांत मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम मुंबईत आपत्ती टाळण्यासाठी आधीच तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला याप्रकरणी सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
तर अशातच भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.