Tuesday, May 7, 2024
Homeमहत्वाची बातमीसरकारी कर्मचा-यांचा संप मागे! सरकार अन् संपकऱ्यांमध्ये यशस्वी तोडगा

सरकारी कर्मचा-यांचा संप मागे! सरकार अन् संपकऱ्यांमध्ये यशस्वी तोडगा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये यशस्वी तोडगा निघाला आहे. त्यामुळे संप मागे घेण्याची घोषणा कर्मचा-यांच्या समन्वय समितीचे नेते विश्वास काटकर यांनी केली.

यामुळे उद्यापासून कर्मचा-यांनी आपापल्या कार्यालयात हजर व्हावे, असे आवाहनही विश्वास काटकर यांनी केले आहे. यावेळी काटकर यांनी राज्य सरकारसह साथ आणि पाठिंबा देणा-या सर्वांचे आभार मानले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये यशस्वी तोडगा निघाला आहे. त्यानुसार, संपातील संघटनांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली.

याबाबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात विधानसभेत निवेदन सादर करणार आहेत. दरम्यान, या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यास गती मिळणार आहे. तर, गेल्या ७ दिवसांपासून रुग्णालयात होत असलेल्या रुग्णांची गैरसोय दूर होऊन सुरळीत उपचार सुरू होतील. त्यासोबतच, शासकीय कार्यालयात नागरिकांना पुन्हा सेवा सुरू होणार असून शाळा, कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर होणारा परिणाम दूर होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -