Monday, July 27, 2026

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका नाही. पण रात्रीच्या जेवणानंतर चालणे सुद्धा शरीरासाठी तितकेच फायदेशीर असते.

अनेक लोक रात्रीच्या जेवणानंतर TV पाहत बसतात किंवा लगेच झोपतात परंतु, या सवयी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. जेवणानंतर शरीराची हालचाल झाली नाही तर पचनसंस्था मंदावते. ज्यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे आणि वजन वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. जेवल्यानंतर लगेच पाठीवर टेकल्यास पोटातील पाचक रस आणि अन्न उलटे अन्ननलिकेत येण्याचा धोका जास्त असतो. याला वैद्यकीय भाषेत ॲसिड रिफ्लेक्स किंवा छातीत जळजळ होणं असं म्हणतात.

रात्रीच्या जेवणानंतर शरीरातील ब्लड शुगर लेव्हल अत्यंत वेगाने वाढते. अशावेळी १० ते १५ मिनिटे चालल्यास आपल्या शरीरातील स्नायू रक्तातील ग्लुकोजचा ऊर्जेसाठी वापर करू लागतात. यामुळे जेवणानंतर अचानक वाढणारी साखरेची पातळी नियंत्रणात राहते. प्री-डायबिटीज आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी रात्रीचा हा १५ मिनिटांचा वॉक (walk) एखाद्या औषधासारखा काम करतो.

शतपावली :

रात्रीच्या जेवणानंतर रोज नियमितपणे फक्त १० ते १५ मिनिटे चालल्याने पचन प्रक्रिया वेगाने सुरू होते, पोटाशी संबंधित ९० टक्के आजार दूर राहतात. ॲसिडिटी किंवा अपचन होत नाही. शरीर आतून निरोगी राहते. बरेचं लोक शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी अनेक प्रकारची औषधे आणि डिटॉक्स ड्रिंक्स घेतात पण, जेवणानंतर केलेली १० ते १५ मिनिटांची शतपावली (nightwalk) औषधाप्रमाणेच काम करते आणि शरीराला अनके फायदे मिळवून देते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >