Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीदावे निकाली काढण्यात एलआयसी तिसऱ्या स्थानी

दावे निकाली काढण्यात एलआयसी तिसऱ्या स्थानी

मुंबई  :आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये दावे निकालात काढण्यात भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) तिसऱ्या क्रमांकावर आहे. या काळात एलआयसीने ९० टक्क्यांहून अधिक दावे निकाली काढले आहेत. विमा नियामक आणि िवकास प्राधिकरणाने (इरडा) याबाबतचा अहवाल जारी केला आहे.

या अहवालानुसार आयुर्विम्याचे ११ लाख दावे विमा कंपन्यांकडे आले. त्यापैकी १० लाख ८४ हजार दावे निकाली काढण्यात आले. या दाव्यांपैकी २६,४२२ कोटी रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली. तर, ९ हजार ५२७ दावे फेटाळून लावण्यात आले.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ३१ मार्च २०२१ पर्यंत ९८.६२ टक्के दावे निकाली काढले. २०१९-२० या आर्थिक वर्षात दावे निकाली काढण्याचे हे प्रमाण ९६.६९ टक्के होते.

खासगी विमा कंपन्यांनी ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ९७.०२ टक्के दावे निकाल काढले. तर, २०१९-२० या आर्थिक वर्षात हेच प्रमाण ९७.१८ टक्के होते.

विमा दावे निकाली काढण्याचे प्रमाण

मॅक्स लाइफ : ९९.३५%
एगॉन : ९९.२५%
भारती अक्सा : ९९.०५%
एलआयसी : ९८.६२%

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -