Monday, May 6, 2024
Homeमहत्वाची बातमीसंजय राऊत यांनी तब्बल २०० कोटी रुपये घेतले! कारण....

संजय राऊत यांनी तब्बल २०० कोटी रुपये घेतले! कारण….

भाजप आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

अमरावती: शिवसेनेच्या सुरु असलेल्या वाताहतीला संजय राऊत जबाबदार आहेत. त्यांनी शिवसेना फोडण्याची सुपारी घेतली आहे. शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी त्यांनी २०० कोटी रुपये घेतले. उगाच अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन टीआरपी वाढण्याचे काम राऊत यांनी करु नये, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षाच्या कार्यकाळासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमानिमित्त आमदार नितेश राणे हे शुक्रवारपासूनच अमरावतीमध्ये आले होते. त्यांनी आज पत्रकार परिषदेतून संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी राज्यात अनेक दंगली घडविल्या. दंगलीशिवाय आपण मुख्यमंत्रीच होऊ शकत नाही, असे वक्तव्य देखील त्यांनी केले होते. त्यामुळे राज्यात सुरु असलेल्या दंगली प्रकरणी उद्धव ठाकरे यांचीच नार्को टेस्ट करायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, २०१४ पासून शिवसेनेची सुरु असेलेली वाताहत याला जबाबदार हे संजय राऊत असून त्यांनी शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करण्यासाठी २०० कोटी रुपयांची सुपारी घेतली आहे. त्यामुळे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन राऊत यांनी स्वत:चा टीआरपी वाढवू नये, त्यांनी स्वत:ला किती मध्ये विकले हे सांगावे, २०० कोटी घेतले की नाही याची माहिती द्यावी. राऊत यांच्याकडे येणारा पैशा हा दलालीतूनच येत असल्याचा जोरदार घणाघात नितेश राणे यांनी केला. यावेळी पत्रकार परिषदेला आमदार प्रविण पोटे पाटील, शहराध्यक्ष किरण पातूरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवेदीता चौधरी, सिद्धार्थ वानखडे आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -