Wednesday, May 1, 2024
Homeताज्या घडामोडीMurder: उधारीचे २०० रूपये परत मागितल्याने केली तरूणाची हत्या, तिघांना अटक, दोन...

Murder: उधारीचे २०० रूपये परत मागितल्याने केली तरूणाची हत्या, तिघांना अटक, दोन फरार

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एका तरूणाच्या हत्येचे प्रकरण समोर आलेआहे. ही हत्या केवळ २०० रूपयांसाठी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर मृत तरूणाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ही घटना नगलापान सहाय येथील आहे. येथे राहणाऱ्या कमलेशने ओळखीच्या भूपेंद्रला २०० रूपये उधार दिले होते. बऱ्याच दिवसांपासून तो भूपेंद्रकडे पैसे मागत होता. मात्र भूपेंद्र काही पैसे परत करत नव्हता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान शिवीगाळ झाली तसेच मारझोडही झाली. यानंतर कमलेशने बदला घेण्यासाठी आपल्या ५ साथीदारांसह भूपेंद्रला धडा शिकवण्याचा प्लान बनवला.

उधारीचे २०० रूपये मागण्यावरून झाली हत्या

९ नोव्हेंबरच्या रात्री जेवायला म्हणून भूपेंद्रला एकट्याला बोलावले. त्याला तेथे दारू पाजण्यात आली. त्यानंतर ५ मित्रांसह मिळून त्याची हत्या करून त्याचा मृतदेह झाडीत फेकण्यात आला. पोलिसांनी या हत्येचा खुलासा करताना दीवान सिंह, विजय आणि मनोज यांना अठक केली. याशिवाय यातील दोन अन्य आरोपी फरार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -