नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे लष्कराचे दोन शेल्टर वाहून गेले आहेत. पुरात पाच सैनिक वाहून गेले आहेत. तसेच अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात चार नागरिकांचा भूस्खलन झाल्यामुळे मृत्यू झाला.
कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर ...
केओजारिंग-बायचिंग रस्त्यावर मोठे भूस्खलन झाले. या भूस्खलनात तादू बाकी, ताजी राय, मार्कोश बसुमतारी, बाबुल अली यांचा मृत्यू झाला. दिबांग व्हॅली जिल्ह्यात पसु पानी येथे पाचव्या ग्नेनेडिअरचे दोन शेल्टर वाहून गेले. पुरात सात सैनिक वाहून गेले. यापैकी दोन जणांना वाचवण्यात आले आहे. वाहून गेलेल्या हवालदार उपेंदर, हवालदार कुंदन, हवालदार विनोद, हवालदार आदित्य, हवालदार समुंदा या पाच जणांचा शोध सुरू आहे. सैनिक आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे शोधमोहिम राबवत आहेत.






