कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर शुक्रवारी मौन सोडले. या प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. (Sourav Ganguly)
कोलकाता येथील 'ॲक्रोपॉलिस मॉल'मध्ये एका दुकानाच्या उद्घाटनादरम्यान पत्रकारांशी बोलताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला, "आम्ही याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा योग्य तो सोक्षमोक्ष लावतील याची मला खात्री आहे. धमकी आलेला फोन नंबर हा कोलकातामधीलच आहे. आशा आहे की पोलीस योग्य ती कारवाई करतील. माझ्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे." (Sourav Ganguly)
गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला जात आहे. गॉल कसोटीत नाणेफेक जिंकून ...
कोलकात्यातील ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गांगुली आणि त्याच्या कुटुंबाला गेल्या सहा महिन्यांपासून धमकीची पत्रे येत होती. या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या दोन पत्रांमध्ये "संपवून टाकू" अशा अत्यंत गंभीर शब्दांचा वापर करण्यात आल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले. सुरवातीला गांगुली कुटुंबाने या पत्रांकडे काही अतिउत्साही चाहत्यांचे कृत्य म्हणून दुर्लक्ष केले होते. मात्र, धमक्यांचे सत्र सुरूच राहिल्याने आणि पत्रांतील भाषा अधिक आक्रमक झाल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. (Sourav Ganguly)





