Devendra Fadnavis : राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन होणार

- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; पहिल्या टप्प्यात ४ हजार कोटींचा निधी उभारणार


मुंबई : राज्यातील वाढती पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि प्रदूषित नद्यांना संजीवनी देण्यासाठी फडणवीस सरकारने (Devendra Fadnavis) अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारतर्फे 'महाराष्ट्र राज्य पुनरुज्जीवन परिषद' या विशेष कंपनीची स्थापना केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात या बृहत् प्रकल्पासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे राज्यातील विविध भागांत होणारी पाण्यासाठीची भटकंती आणि टंचाई रोखण्यास मोठी मदत होणार आहे.


प्रस्तावित 'महाराष्ट्र राज्य पुनरुज्जीवन परिषदे'च्या अध्यक्षपदी स्वतः मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) असणार आहेत, तर राज्याचे पर्यावरण मंत्री या परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील. नदी पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा निधी उभारताना जागतिक बँकेसह इतर विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.



या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि नियोजन सुरळीत व्हावे यासाठी पर्यावरण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय 'राज्यस्तरीय कार्यकारी समिती'ची स्थापना केली जाणार आहे. या समितीत विविध क्षेत्रांतील तांत्रिक तज्ज्ञ, आर्थिक व कायदेशीर सल्लागार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सदस्य सचिव तसेच आयआयटी सारख्या नामांकित राष्ट्रीय संस्थांमधील तज्ज्ञ प्रतिनिधींचा समावेश केला जाईल. (Rivers rejuvenated)



फायदा काय?


या परिषदेच्या माध्यमातून नद्यांच्या पात्रातील आणि काठांवरील अतिक्रमणे हटवणे, आवश्यक तेथे जमीन संपादन करणे, आणि राष्ट्रीय स्तरावरील योजनांसाठी निवडक नदी प्रकल्पांची (Rivers rejuvenated) शिफारस करणे यांसारखी कडक पावले उचलली जातील. याशिवाय, संपूर्ण नदी खोरे व्यवस्थापन आराखडे तयार करणे तसेच सविस्तर प्रकल्प अहवालांना (डीपीआर) मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला गती देणे, ही या विशेष परिषदेची मुख्य कर्तव्ये असणार आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा

Nitesh Rane : मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

रामेश्वर-देवगड येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद

CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण; पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

मुंबई : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल

BMC contractors fight : BMC कार्यालयाबाहेर कंत्राटदारांमध्ये तुफान राडा! एकमेकांवर केले सुऱ्याने वार; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माटुंगा येथील एफ-नॉर्थ (F-North) वॉर्ड कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांमध्ये

DY Patil Passed Away : ज्यांच्या दूरदृष्टीने भारताला दिले 'हे' ऐतिहासिक मैदान; जिथे भारतीय महिला संघाने जिंकला पहिला वर्ल्ड कप!

नवी मुंबई : देशातील उच्च शिक्षण संस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि 'पद्मश्री' विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील