Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण काहींच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात त्यापैकी एक धक्कादायक म्हणजे अडथळा म्हणजे कास्टिंग काऊचचा. हिंदी सिनेविश्वातच नाही तर, अन्य सिनेविश्वात देखील अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा (Casting couch) सामना करावा लागतो. या कारणास्तव उराशी मोठं होण्याचं स्वप्न बाळगून आलेल्या अनेक अभिनेत्री स्वतःची ओळख भक्कम करण्याआधीच इंडस्ट्रीला राम राम ठोकतात.
Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पाली हिल येथील ...
अभिनेत्रीचं कास्टिंग काऊचवर मोठं वक्तव्य
पण आता कास्टिंग काऊचची व्याख्या बदलली आहे असं एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं आहे, पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्रसिद्ध अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. भोजपुरी अभिनेत्री अंजना सिंह (Anjana Singh) या अभिनेत्रीने एका मुलाखतीत कास्टिंग काऊचवर बेधडकपणे मोठं वक्तव्य केलं आहे, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अंजना हिने कास्टिंग काऊचच्या (Casting couch) बदललेल्या विचारांबद्दल सांगितलं आहे.
Bollywood movies : तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. चित्रपटप्रेमींसाठी जुलै महिना मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. या महिन्यात अनेक हिंदी ...
आधी शारीरिक संबंधांची मागणी, आता...
अंजना म्हणाली आधी भूमिकांच्या बदल्यात अभिनेत्रींकडून शारीरिक संबंधांची मागणी केली जायची, पण आता काळ बदललेला आहे. मला असं वाटतं आता कास्टिंग काऊचला बाजूला ठेवा, आता ते कास्टिंग काऊच राहिलेलं नाही. आता ते असं झालं आहे की, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. याचा अर्थ असा होतो की, जोपर्यंत प्रेम आहे, तोपर्यंत काम मिळणार. त्यानंतर कायम होणार हे आपल्याला माहिती नाही’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
Ek Hota Malin Marathi Movie : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण... ३० जुलै २०१४ ची ती काळरात्र आजही महाराष्ट्र विसरलेला नाही. पावसासाठी वरुणराजाची प्रार्थना ...
फरहाना भट्टही थोडक्यात वाचली
महत्त्वाचे म्हणजे, अंजना सिंहपूर्वी इतरही अभिनेत्रींनीं कास्टिंग काऊचबद्दल वक्तव्य केलं आहे. याआधी देखील अनेका अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग आणि झगमगत्या दुनियेतील काळं सत्य जगासमोर आणलं आहे. सांगितला आहे. बिग बॉस फेम फरहाना भट्ट हिने देखील सुरुवातीच्या काळात तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं आहे. फरहाना हिला सिनेमांमध्ये काम करण्याच्या बहाण्याने मुंबईत बोलवण्यात आलं होतं. पण तिच्यासमोर अट ठेवण्यात आलेली की, काही आठवड्यांसाठी दिग्दर्शकाच्या फार्महाऊसवर राहावं लगणार आहे. येथे अभिनेत्रीला काही तरी गडबड वाटली ज्यामुळे फरहान हिने तेथून पळ काढला.
फरहाना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिग बॉसनंतर तिच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली. आज फरहाना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. आता सोशल मीडियावर फरहाना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फरहाना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.




