Nashik Rain Update : राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासासाठी रेड अलर्ट जारी केला. नाशिक जिल्ह्यात पुढील ४८ तासांत ढगफुटीसदृश मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, काही ठिकाणी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या नाशिकच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून आपत्तीव्यवस्थान कक्षाला भेट
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून आपत्तीव्यवस्थान कक्षाला भेट देण्यात आली आहे. यादरम्यान त्यांनी सर्व पाहणी करत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, अतिवृष्टी सुरू आहे. काही भागांमध्ये पुरपरिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात वारा सुरू आहे. त्यामध्ये दरड कोसळत आहे. यासंदर्भात जो आपत्तीव्यवस्थापन कक्ष आहे. याठिकाणी राज्यातील सर्व प्रमुख अधिकारी आहेत. (Nashik Rain Update)
मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या सहा दिवसांत विविध घटनांमध्ये १० ...
उद्या नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पावसाची शक्यता
यावेळी त्यांनी नाशिकबाबत देखील भाष्य केले आहे. ते म्हणाली की, उद्याचा नाशिकला अलर्ट आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भागात उद्या ढगफुटी संभावित आहे उद्या त्या भागात 300 एमएमचा पाऊस पडू शकतो. उद्या तिथे प्रशासकीय पातळीवर योग्य ती खबरदारी घेत आहोत, उपाययोजना करत आहोत. 8 तारखेपर्यंत सातत्याने हे सगळे अलर्ट्स देण्यात आलेले आहेत. (Nashik Rain Update)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; दुपारनंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता मुंबई : "गेल्या काही तासांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे ...
राज्यात 8 तारखेपर्यंत अलर्ट
मुंबईकडे येणारी एक लेन सुरू आहे आणि पुण्याकडे येणारी एक लेन सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत आणि पाणी साचले आहे. ज्यावेळी 70 च्या वेगाने वारे वाहिल, त्यावेळी वेगवेगळ्या संभावणा आहेत. महिनाभर जितका पाऊस पडतो तो पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईत झालाय. राज्यात 8 तारखेपर्यंत अलर्ट आहे. काल दिवसभरात 350 झाडे पडली. अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा ...
अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कोल्हापुरातही धोक्याची घंटा आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती असणार आहे. इंद्रायणी नदीचे सगळे पूल पाण्याखाली जातायत. वारकऱ्यानी देखील काळजी घेतली पाहिजे. वारकऱ्यानी देहू आणि आळंदी परिसरात न जाता थेट पुण्याचे येण्याचे आवाहन. लोकांना आपण अलर्ट करत आहोत लोकानी काळजी घेण्याची गरज आहे.
संध्याकाळी आढावा घेऊन सुट्टीबाबत निर्णय घेऊ
उद्यासाठी संध्याकाळी आढावा घेऊन सुट्टीबाबत निर्णय घेऊ. खाजगी कार्यालयाच्या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुट्टीचा निर्णय कार्यालयानी घेण्याची गरज आहे. हा मानवता धर्म आहे तो पाळला जाईल अशी अपेक्षा असते. मेट्रो, रेल्वे पूर्णपणे ठप्प झालेल्या नाहीत काही अडचणी येत आहेत पण सेवा देण्याचे काम सुरू आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.





