Devendra Fadnavis : संजय दीना पाटलांना योग्य समज द्या;

मुंबई : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धमकी दिल्याचा आणि जाहीरपणे शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fandvis) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, "महायुतीमध्ये लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबाबत अशी बेजबाबदार आणि शिवराळ भाषा अजिबात खपवून घेतली जाणार नाही. संबंधित खासदारांना तातडीने आणि कडक शब्दांत योग्य समज देण्यात यावी, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल," अशी नाराजी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांना बोलून दाखवली आहे.



गुरुवारी ३ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या प्रकरणाबाबत तातडीची बैठक पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बंद दाराआड झालेल्या बैठकीत खासदार संजय दीना पाटील यांच्या विधानाचा अत्यंत कठोर शब्दांत निषेध केला. "गेल्या काही महिन्यांत शिवसेनेतील नेत्यांकडून सातत्याने जाहीरपणे वादग्रस्त विधाने केली जात आहेत. मात्र, पत्रकारांना पोलिसांसमोर जाहीरपणे धमकावणे आणि शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.



"महायुतीची प्रतिमा अशा विधानांमुळे मलिन होत असून यापुढे अशा प्रकारची दादागिरी आणि वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. खासदार पाटील यांना तातडीने समज द्या, अन्यथा गृह खाते म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल," असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी दिल्याचे समजते.

Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे