Varun Chakravarthy : आयर्लंड विरूद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का ! स्टार गोलंदाज संघातून बाहेर

Mumbai : भारतीय संघाने घरच्या मैदानावर शानदार खेळ करत अफगाणिस्तान विरुद्धचा एकमेव कसोटी सामना तसेच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली आहे. आता भारत आर्यंलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २६ जून तर दुसरा सामना २८ जून ला होणार आहे. यासाठी बीसीसीआयने आधीच संघाची घोषणा केली आहे. पण ही स्पर्धा सुरू होण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे.आयर्लंड विरूद्धच्या सामन्यांसाठी संघात निवड झालेल्या वरुण चक्रवर्तीला दुखापतीमुळे स्पर्धा सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. वरुण आंतरराष्ट्रीय टी-२० तील नंबर वन गोलंदाज आहे. तोच खेळणार नसल्यामुळे टीम इंडियाच्या नियोजीत डावपेचांना धक्का बसला आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी (२१ जून) एक निवेदन जाहीर केले, ज्यामध्ये बीसीसीआयने सांगितले की, वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे आयर्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. बीसीसीआयच्या निवेदनानुसार, आयपीएल २०२६ मध्ये डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर झाला आहे. तो सध्या बीसीसीआयच्या सीओई येथे फिटनेसवर काम करत आहे. तसेच वरुणच्या जागी कोण खेळणार? हे अद्याप बीसीसीआयने स्पष्ट सांगितलेले नाही.आयपीएल २०२६ मध्ये पायाला हेअरलाइन फ्रॅक्चर होऊनही वरुणने गुजरात टायटन्सविरुद्ध आपली चारही षटके टाकल्यामुळे तो टीकेचा धनी झाला होता. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या करा किंवा मरा सामन्यात त्याने चार षटके टाकताना ४७ धावा देत एकही विकेट घेतली नव्हती. त्यावेळी त्याला त्याच्या नेहमीच्या पातळीवर गोलंदाजी करणे कठीण गेले आणि त्याचा फॉर्मही गायब झाल्याचे दिसले.



आयर्लंड टी20 मालिकेसाठी भारताचा सुधारीत संघ-


श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिध्द कृष्णा



आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये वरुण चक्रवर्तीची कामगिरी


वरुण चक्रवर्तीने भारतासाठी ४५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून, यात त्याने १६.६२ च्या उत्कृष्ट सरासरीने आणि ७.५६ च्या इकॉनॉमी रेटने ७३ बळी घेतले आहेत. आपल्या गूढ फिरकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वरुणची आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वोत्तम कामगिरी १७ धावांत पाच बळी अशी आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत दोन वेळा ४ बळी आणि दोन वेळा ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. टी२० विश्वचषकातही त्याने भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असून, तेथे १५ सामन्यांमध्ये ८.५२ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना सात धावांत तीन बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. वरुण संघात नसल्याने भारताच्या फिरकी विभागाची अधिक जबाबदारी अक्षर पटेलवर असेल.

Comments
Add Comment

Eng vs Ind: धोनीचा रेकॉर्ड धोक्यात ! आजच्या सामन्यात जॉस बटलरकडे विक्रम मोडण्याची सुवर्ण संधी

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा अंतिम सामना ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे

Wimbledon : विम्बल्डनच्या रॉयल बॉक्समध्ये शुभमन गिलची उपस्थिती; सचिन आणि अंजली तेंडुलकरसोबतचा फोटो व्हायरल

लंडन: क्रिकेट विश्वातील युवा फलंदाज आणि भारतीय कर्णधार शुभमन गिल सध्या लंडनमध्ये असून, त्याने विम्बल्डनच्या

Smriti Mandhana : लॉर्ड्सवर स्मृती मंधानाचा ऐतिहासिक विक्रम! ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारताची तिसरी महिला क्रिकेटपटू

लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आणखी

Historic Lord's Test : स्मृती मंधानाचा ३०० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा; भारतीय महिला क्रिकेटमध्ये नवा विक्रम

लंडन: क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताची स्टार

Lords Test Ind(w) vs Eng(w) : पहिल्या दिवशी भारताची दमदार फलंदाजी; इंग्लंडची एक विकेट झटपट काढली

लंडन: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड महिला संघात सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्याच्या

Wimbledon 2026 : विम्बल्डनमध्ये सिनरची दणदणीत एंट्री! जोकोव्हिचचा सरळ सेटमध्ये पराभव; अंतिम फेरीत झ्वेरेव्हशी महामुकाबला

लंडन : विद्यमान विजेता जॅनिक सिनरने (Jannik Sinner) विम्बल्डन २०२६ (Wimbledon 2026) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टेनिसचा महान खेळाडू