Nashik : 'शालार्थ आयडी घोटाळा' हा सुनियोजित कट - सत्र न्यायालय; उपासनीच्या जामिनावर उद्या सुनावणी

Nashik : नाशिक विभागातील बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण राज्यात गाजत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) या संदर्भात गुन्हा दाखल असून या प्रकरणाने विभागातील ५०० हून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक अडचणीत आले आहेत. शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे.


या गुन्ह्यातील संशयित व सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नितीन उपासनीच्या (Nitin Upasani) जामिनाबाबत उद्या शुक्रवारी (दि. १९) सुनावणी होणार आहे. दरम्यान, शैक्षणिक संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून संशयितांनी सुनियोजित कट रचत फसवणूक केल्याचे निरीक्षण नाशिकरोड सत्र न्यायालयाने (Nashik Road Sessions Court) पोलीस तपासाच्या आधारे नोंदविले आहे.



'शालार्थ आयडी घोटाळा' हा सुनियोजित कट


नाशिकरोड पोलीस ठाण्यात मार्च २०२६ मध्ये दाखल गुन्ह्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी संशयित नितीन बच्छावचा जामीन यापूर्वीच फेटाळण्यात आला आहे. बच्छाव याचा जामीन अर्ज फेटाळताना पोलिसांच्या तपासाच्या आधारे हा गुन्हा केवळ तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा नसून, मुलांच्या शिक्षणासाठी असणाऱ्या सार्वजनिक पैशांची पद्धतशीर केलेली लूट आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांचे हक्क हिरावले गेले असून, शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. हा एक सुनियोजित कट असलेला पांढरपेशा गुन्हा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.



अशोक गिरी नियंत्रण कक्षात


मार्च २०२५ मध्ये नाशिकरोड पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या गुन्ह्यात १२६ संशयित आहेत. त्यापैकी चव्हाण अद्यापही फरार असून, या गुन्ह्यात नाशिकरोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांना गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहसंशयित केले आहे. गतवर्षी निलंबित झालेल्या गिरी यांची पोलीस आयुक्तालयाने नियंत्रण कक्षात नेमणूक केली आहे.



संपूर्ण प्रकरणाची विभागीय स्तरावर चौकशी


नाशिक विभागातील खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील तब्बल ८९२ कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी शासकीय नोंदीतील जावक क्रमांकांशी जुळत नसल्याचे चौकशीत उघड झाले होते. या प्रकारामुळे शालार्थ प्रणालीतील पारदर्शकता, मान्यता प्रक्रिया आणि शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. संबंधित कर्मचाऱ्यांना मिळालेल्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्याअनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाची विभागीय स्तरावर चौकशी काही महिन्यांपासून सुरू आहे.


दरम्यान, शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित राज्य शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष संशयित नितीन उपासनी हा कारागृहात असून, त्याच्याविरुद्ध नाशिक, मालेगावसह नवी मुंबई येथील वाशी पोलिसांतही गुन्हे दाखल आहेत. तर, तत्कालीन शिक्षणाधिकारी संशयित नितीन बच्छाव, भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह इतर संशयितांविरोधात नाशिकरोड पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. याबाबत सन २०२६ मध्ये दाखल गुन्ह्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी 'एसआयटी' स्थापन केली असून, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment

CJP : सीजेपी आंदोलनकाळात महाराष्ट्रात दाखल गुन्हे रद्द होणार

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'मधील अनियमिततेविरोधात आणि कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ

  Quick Breakfast Recipes : फक्त १५ मिनिटांत तयार होणारे ८ झटपट नाश्त्याचे पदार्थ

सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप भूक लागलेली असते. (Easy & Quick Snack Recipes For Breakfast). यातच सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याची घाईगडबड तसेच

AAFA 2026 : अल्लू अर्जुन ने जिंकली चाहत्यांची मने; भारतीय संस्कृती जपत काढली पादत्राणे

अल्लू अर्जुन आज देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया सुपरस्टार्सपैकी एक आहेत. पुष्पा फ्रँचायझीच्या अभूतपूर्व

High Protein Fruits : कोणत्या फळात किती प्रोटीन? रोजच्या आहारात फळांचा समावेश कसा करावा?

रोजच्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेक जण "हाय-प्रोटीन फळे" शोधण्याचा प्रयत्न करतात. फळे ही

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त

Solo Trip : सोलो ट्रीपला जाण्याचा प्लॅन करताय ? मग या ठिकाणांचा नक्की विचार करा

मुंबई : एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. सोलो ट्रिपमुळे (Solo Trip) नवीन ठिकाणं अनुभवता येतात,