Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारूनही शंभूराज देसाईंच्या मनाविरुद्ध घडले

 सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक; महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश


मुंबई : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीवरून पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीमध्ये उफाळून आलेला अंतर्गत कलह मंत्रालयापर्यंत पोहोचला. भाजपच्या स्थानिक नेत्यांशी असलेल्या तीव्र मतभेदांमुळे संतप्त झालेले राज्याचे पर्यटन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. मात्र, या बैठकीला गैरहजर राहून दबावाचे राजकारण करण्याचा देसाईंचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादात हस्तक्षेप करत, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मतदान करावे, असा सक्त आदेश दिला आहे. त्यामुळे शंभूराज देसाई यांना अखेर आपल्या मनाविरुद्ध जाऊन महायुतीचा धर्म पाळावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे..(Vaibhav Sooryvanshi)


सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान पार पडणार आहे. महायुतीकडून भाजपने धैर्यशील कदम यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अभयसिंह जगताप यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात भाजप आणि शिवसेनेत प्रचंड धुसफूस सुरू आहे. या राजकीय संघर्षाला सातारा जिल्हा परिषदेत (झेडपी) काही दिवसांपूर्वी झालेल्या धक्काबुक्कीची आणि स्थानिक वर्चस्ववादाची पार्श्वभूमी लाभली आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपची कोंडी करण्याची रणनीती आखली होती. १३ जून रोजी कराड येथे भाजपने बोलावलेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीकडे या दोन्ही मंत्र्यांनी पाठ फिरवली होती. या बैठकीला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल बाबा भोसले आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते.



एकनाथ शिंदेंचे आदेश काय?


या पार्श्वभूमीवर, मंत्री देसाई यांनी सोमवारी साताऱ्यात शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. कार्यकर्त्यांच्या या भावनांचा सविस्तर अहवाल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. "शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, फक्त आमची नाराजी वरिष्ठांपर्यंत पोहोचावी," अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.मात्र, हा अहवाल हाती पडताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही सबब ऐकून न घेता, "सातारा-सांगली निवडणुकीत शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचे मत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडले पाहिजे, एकही मत फुटता कामा नये," असा आदेश शंभूराज देसाई यांना दिला.

Comments
Add Comment

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७३३.२८ कोटी मंजूर

सागरी सुरक्षा, सायबर सेल आणि 'एआय' तंत्रज्ञानावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान व

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : महिला बचत गटांना देणार अडीच एकर जमीन

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; पडीक जमिनी वापरखाली आणण्यासाठी निर्णय मुंबई : राज्यातील ग्रामीण

Gadchiroli to Australia : लॉयड्स मेटल्सची चौथी 'ग्लोबल एज्युकेशन' बॅच; गुणवंत विद्यार्थ्यांसाठी संधी

गडचिरोली: गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलवादग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता जागतिक पंख

बंदर कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी राज्यातील सहा आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम - मंत्री नितेश राणे

मुंबई: सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी

Operation Tiger : मंत्रिपदाच्या हट्टामुळे अडले 'ऑपरेशन टायगर'?

 ४ खासदार उत्सुक; मराठवाड्यातील 'त्या' नेत्याला लॉटरी लागण्याची शक्यता मुंबई : उबाठा गटातील अंतर्गत अस्वस्थतेचा

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक