Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारूनही शंभूराज देसाईंच्या मनाविरुद्ध घडले

 सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक; महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश


मुंबई : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीवरून पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीमध्ये उफाळून आलेला अंतर्गत कलह मंत्रालयापर्यंत पोहोचला. भाजपच्या स्थानिक नेत्यांशी असलेल्या तीव्र मतभेदांमुळे संतप्त झालेले राज्याचे पर्यटन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. मात्र, या बैठकीला गैरहजर राहून दबावाचे राजकारण करण्याचा देसाईंचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादात हस्तक्षेप करत, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मतदान करावे, असा सक्त आदेश दिला आहे. त्यामुळे शंभूराज देसाई यांना अखेर आपल्या मनाविरुद्ध जाऊन महायुतीचा धर्म पाळावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे..(Vaibhav Sooryvanshi)


सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान पार पडणार आहे. महायुतीकडून भाजपने धैर्यशील कदम यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अभयसिंह जगताप यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात भाजप आणि शिवसेनेत प्रचंड धुसफूस सुरू आहे. या राजकीय संघर्षाला सातारा जिल्हा परिषदेत (झेडपी) काही दिवसांपूर्वी झालेल्या धक्काबुक्कीची आणि स्थानिक वर्चस्ववादाची पार्श्वभूमी लाभली आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपची कोंडी करण्याची रणनीती आखली होती. १३ जून रोजी कराड येथे भाजपने बोलावलेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीकडे या दोन्ही मंत्र्यांनी पाठ फिरवली होती. या बैठकीला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल बाबा भोसले आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते.



एकनाथ शिंदेंचे आदेश काय?


या पार्श्वभूमीवर, मंत्री देसाई यांनी सोमवारी साताऱ्यात शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. कार्यकर्त्यांच्या या भावनांचा सविस्तर अहवाल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. "शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, फक्त आमची नाराजी वरिष्ठांपर्यंत पोहोचावी," अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.मात्र, हा अहवाल हाती पडताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही सबब ऐकून न घेता, "सातारा-सांगली निवडणुकीत शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचे मत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडले पाहिजे, एकही मत फुटता कामा नये," असा आदेश शंभूराज देसाई यांना दिला.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात