Nashik : चिंचखेड येथे बिबट्याची दोघांवर झडप, थोडक्यात बचावले

दिंडोरी : तालुक्यात बिबट्यांचा सुळसुळाट कायम आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याने दोन शेतकऱ्यांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रमेश रंगनाथ पांडे (वय 70) आणि अक्षय अनिल पगारे (वय 26) या दोघांवर बिबट्याने हल्ला केला आहे.



नेमकं काय घडलं ?


सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान रमेश रंगनाथ पांडे शेतातून काम आटोपून मोटारसायकल वरून घरी येत होते. पांडे यांच्या हातात दुधाची किटली होती. दरम्यान बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्याने पांडे यांच्या गुडघ्याला चावा घेतला. ज्यामुळे पांडे गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गाडीवरून गावाकडून मळ्याकडे जात असताना अक्षय पगारे या तरुणाच्या गाडीवर बिबट्याने धडक मारत त्याच्याही पायाला चावा घेतला.


दोन्ही जखमींवर स्थानिक डॉक्टरांनी ड्रेसिंग करून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविले आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर या बिबट्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात