Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीकडून पुन्हा निराशा! तीच चूक नडली; श्रीलंका 'अ' विरुद्ध २१ धावांवर बाद

भारतीय क्रिकेटमधील युवा सनसनाटी आणि आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याला श्रीलंका 'अ' संघाविरुद्धच्या तिरंगा मालिकेत पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. सलग दुसऱ्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाला. पहिल्या सामन्यात अवघ्या १४ धावांवर बाद झालेल्या वैभवने यावेळी २१ धावांची खेळी केली, मात्र त्याची खेळी पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकली नाही. (Vaibhav Sooryavanshi)


आयपीएल २०२६ मध्ये तब्बल ७२ षटकार ठोकून चर्चेत आलेल्या वैभवला मागील दोन सामन्यांत एकही षटकार मारता आला नव्हता. मात्र या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत षटकारांचा दुष्काळ संपवला. १४ चेंडूंतील २१ धावांच्या खेळीत त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. (Vaibhav Sooryavanshi)



भारत 'अ' संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागली. वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंग यांनी डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात सावध खेळ केल्यानंतर दुसऱ्या षटकात वैभवने आक्रमक फटकेबाजी करत एका षटकातच १७ धावा चोपल्या. त्याने चौकार, षटकार आणि पुन्हा चौकार लगावत गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. (Vaibhav Sooryavanshi)


मात्र चौथ्या षटकात त्याची तीच जुनी कमकुवत बाजू पुन्हा समोर आली. ऑफ स्टंपच्या बाहेर उसळी घेणाऱ्या चेंडूवर पायांची हालचाल न करता फटका मारण्याचा प्रयत्न त्याला महागात पडला. चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला लागून पॉइंटच्या दिशेने हवेत गेला आणि वानुजा सहानने शानदार झेल घेत वैभवची खेळी संपवली. गेल्या काही सामन्यांपासून ऑफ स्टंपबाहेरील चेंडूंवर निष्काळजी फटके मारून विकेट गमावण्याची सवय वैभवला महागात पडताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या तांत्रिक खेळावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (Vaibhav Sooryavanshi)



तिरंगा मालिकेत आतापर्यंत वैभव सूर्यवंशीला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याने मालिकेत एकूण ७९ धावा केल्या असून त्यामध्ये १५ चौकार आणि केवळ १ षटकाराचा समावेश आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना वैभवला मात्र सातत्य राखण्यात अपयश येत आहे. आता मालिकेतील पुढील सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशी आपल्या फलंदाजीतील त्रुटी दूर करून मोठी खेळी करतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Vaibhav Sooryavanshi)




Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील