Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरात गोवंश तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई; ४४ आरोपींना अटक!

छत्रपती संभाजीनगर : गोवंश तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई करत तस्करांचे कंबरडे मोडले आहे. चोरट्या मार्गाने गोवंशाची अवैध वाहतूक करणारे, बेकायदेशीर कत्तलखाने चालवणारे आणि गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठं जाळं उद्ध्वस्त केलं आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या आदेशानंतर संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी आक्रमक मोहीम उघडली असून, अनेक मोठे तस्कर भूमिगत झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली आहे.



RTO चा मोठा दणका; वाहन आणि लायसन्सवर थेट कारवाई


गोवंश तस्करी प्रकरणात केवळ गुन्हे दाखल करून पोलीस थांबले नाहीत, तर तस्करांच्या आर्थिक नाड्यांवरही थेट घाव घालण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी तब्बल १९ वाहनं आणि चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यावर तत्काळ कारवाई करत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ५ वाहनांचे परवाने ३० दिवसांसाठी निलंबित केले आहेत. तसेच ६ चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) थेट ९० दिवसांसाठी रद्द (Cancel) करण्यात आले आहेत. याशिवाय इतर जिल्ह्यांतील वाहनांवरही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित आरटीओ (RTO) कार्यालयांकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. भविष्यात गोवंश तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.


१० दिवसांत २४ गुन्हे दाखल; ४४ आरोपी जेरबंद


१६ मे ते २६ मे या अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली. छुप्या मार्गांवर नाकाबंदी, रात्रीची गस्त आणि सुनियोजित छापेमारी करत पोलिसांनी गोवंश तस्करांना जेरबंद केले. वैजापूर, गंगापूर, पैठण, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री आणि करमाडसह अनेक पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी या मोहिमेत धाडसी कामगिरी बजावली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २४ गंभीर गुन्हे दाखल केले असून तब्बल ४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम, भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन अधिनियमांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.



१११ जनावरांची सुटका; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त


पोलिसांनी छापेमारीदरम्यान कत्तलीसाठी अत्यंत निर्दयीपणे डांबून ठेवलेली १११ जनावरे सुखरूप मुक्त केली आहेत. यामध्ये छुप्या ठिकाणी ठेवलेली ४२ जनावरे आणि वाहनांमध्ये कोंबून नेण्यात येत असलेली ६९ जनावरे यांचा समावेश आहे. या सर्व जनावरांची किंमत तब्बल ३३ लाख ९९ हजार २०० रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. मुक्त करण्यात आलेल्या जनावरांना अधिकृत गोशाळांमध्ये पाठवण्यात आले आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपींकडून १ हजार ९४५ किलो गोमांस, वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ५५ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांचं नागरिकांना आवाहन


या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. गोवंशाची अवैध वाहतूक, तस्करी किंवा बेकायदेशीर कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष (0240-2381633) किंवा ‘डायल 112’ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि गोवंश तस्करांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Pune Rain : मुसळधार पावसाचा फटका! भीमाशंकरचा संपर्क तुटला; दोन्ही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद

पुणे : पुणे (Pune) जिल्हा आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या

Wadala building collapse : वडाळ्यात इमारतीचा पहिला मजला कोसळला; तिघेजण किरकोळ जखमी

मुंबई: मुंबईतील वडाळा (Wadala)(पूर्व) परिसरात मंगळवारी इमारतीचा पहिला मजला कोसळल्याची घटना घडली. शांतीनगर येथील

Kalyan Dombivli rain : खांद्याएवढ्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची पोलिसांकडून सुटका; पडघा पोलिसांच्या धाडसी बचावकार्याचे कौतुक

Kalyan Dombivli rain : कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले

Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर