मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा ठसा उमटवणाऱ्या 'मिस्टर इंडिया' (१९८७) या चित्रपटाला २५ मे रोजी ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या या अभिजात चित्रपटातील 'मोगँबो' (Mogambo) हा खलनायक (villain) आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अमरीश पुरी (Amrish Puri) यांनी ही भूमिका अजरामर केली. पण तुम्हाला माहीत आहे का, या भूमिकेसाठी अमरीश पुरी हे निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते तर या भूमिकेसाठी आधी अनुपम खेर (Anupam Kher) यांची निवड करण्यात आली होती.
CUET-UG 2026 Exams : CUET-UG वेळापत्रकात बदल; २८ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली
मुंबई : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET-UG 2026) परीक्षेच्या वेळापत्रकात (Exam Timetable) बदल करण्यात आला ...
विशेष म्हणजे अनुपम खेर (Amrish Puri) यांची स्क्रीन टेस्टही झाली होती.
CUET-UG 2026 Exams : CUET-UG वेळापत्रकात बदल; २८ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली
मुंबई : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET-UG 2026) परीक्षेच्या वेळापत्रकात (Exam Timetable) बदल करण्यात आला ...
">त्यानंतर काही दिवस शूटिंगही केले होते. मात्र, त्यांचा लुक स्केरी वाटण्याऐवजी विनोदी वाटू लागल्याने शेखर कपूर यांनी त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेखर कपूर यांनी अमरीश पुरी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते 'लोहा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. बोनी कपूर (Boney Kapoor) आणि शेखर कपूर (Shekhar Kapur) यांनी त्यांची ऊटी येथे भेट घेऊन त्यांना या रोलसाठी तयार केले. या चित्रपटासाठी अमरीश पुरी (Amrish Puri) यांना तब्बल १ करोड रुपयांचे मानधन देण्यात आले होते.
Rakhi Sawant : राखी सावंत झाली भावूक; "आजपर्यंत मला खरं प्रेमच मिळालं नाही"
मुंबई : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' (Drama Queen) राखी सावंत (Rakhi Sawant) हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठे खुलासे केले आहेत. दोन अपयशी विवाह, प्रेमातील फसवणूक आणि ...
ज्यामुळे ते त्या काळातील सर्वात महागडे खलनायक (villain) ठरले. अनिल कपूर आणि श्रीदेवी (Sridevi) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट केवळ ३.८ करोड रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. त्याने बॉक्स ऑफिसवर १० करोड रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला होता. हा त्यावेळचा रेकॉर्डब्रेक गल्ला होता. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक जोडी सलीम-जावेद यांचा हा एकत्र लिहिलेला शेवटचा चित्रपट होता. १९८२ मध्येच या जोडीमध्ये फूट पडली होती. पण त्यांनी आधीच लिहलेली ही स्क्रिप्ट 'मिस्टर इंडिया'च्या रूपाने पडद्यावर आली. या चित्रपटानंतर दोघांनी अधिकृतपणे आपले मार्ग वेगळे केले.
Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात मोठी अपडेट! दुसरा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट ३-४ दिवसांत, AIIMS कसा तयार करणार अंतिम अहवाल?
भोपाळ : ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात (Twisha Sharma Death Case) दररोज नवे खुलासे आणि प्रश्न समोर येत आहेत. आता सर्वांचे लक्ष ट्विशा शर्माच्या दुसऱ्या शवविच्छेदन (Post-Mortem) ...
बॉलिवूडचा सर्वात खतरनाक खलनायक (Villian) म्हणून 'मोगॅंबो' आज ही घराघरात ओळखला जातो. 'मिस्टर इंडिया' चित्रपटाला २५ मे रोजी प्रदर्शित होऊन मोठा काळ लोटला असला, तरी अमरीश पुरी यांचा 'मोगॅंबो खुश हुआ' हा डायलॉग आजही लोकांच्या जिभेवर आहे. पण, या आयकॉनिक रोलशी जोडलेला एक रंजक इतिहास समोर आला आहे. आयएमडीबीच्या (IMDB) रिपोर्टनुसार, या भूमिकेसाठी आधी अनुपम खेर (Anupam Kher) यांना साईन करण्यात आले होते. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी काही सीन शूटही केले होते, पण त्यांचा लुक मोगँबोच्या क्रूरतेचा अनुभव देऊ शकला नाही. दिग्दर्शकाला मोगँबोच्या रूपात एक घाबरवणारा चेहरा हवा होता. म्हणून अनुपम खेर (Anupam Kher) यांना या प्रोजेक्टमधून बाहेर पडावे लागले.