पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झालमुरी खाऊ घातल्यानंतर चर्चेत आलेले दुकानदार विक्रम साव आता गंभीर अडचणीत सापडले आहेत. विक्रम साव यांनी दावा केला आहे की, गेल्या काही दिवसांपासून त्यांना पाकिस्तान आणि बांगलादेशमधून सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. फोन कॉल आणि दृकश्राव्य संभाषणाच्या माध्यमातून धमक्या येत असल्याने त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Jhalmuri Shopkeeper)
मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार मुंबई : राज्यात काही भागांत निर्माण झालेल्या ...
मात्र हीच ओळख आता त्यांच्या अडचणीचे कारण ठरत असल्याचे दिसून येत आहे. विक्रम साव यांनी सांगितले की, पंतप्रधान त्यांच्या दुकानात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांना सतत धमकीचे फोन आणि दृकश्राव्य कॉल येऊ लागले. कॉल करणारे स्वतःला पाकिस्तान आणि बांगलादेशमधील असल्याचे सांगत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Jhalmuri Shopkeeper)
मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा अनेक ठिकाणी ४० अंशांच्या पुढे गेला ...
त्यांनी अनेकदा फोन न उचलण्याचा प्रयत्न केला, तरी वेगवेगळ्या क्रमांकांवरून सतत कॉल येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धमकी देणारे लोक शिवीगाळ करतात आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी देतात, असा आरोपही त्यांनी केला. (Jhalmuri Shopkeeper)
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्थानिक प्रशासनाने विक्रम साव यांना सुरक्षा पुरवली असून त्यांच्या दुकानाजवळ आणि परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विक्रम साव यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाकडे स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. (Jhalmuri Shopkeeper)






