Uddhav Thackeray : उबाठा प्रमुखांची विधान परिषदेत महा'दांडी'!

- ४ वर्षांत केवळ ४२ दिवस हजेरी; सभागृहाच्या इतिहासात सर्वात कमी उपस्थितीचा लाजिरवाणा विक्रम नोंद


मुंबई : मुख्यमंत्री असताना 'वर्क फ्रॉम होम' करत केवळ फेसबुक लाईव्ह पुरतेच मर्यादित राहिलेले 'उबाठा' प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभार आता अधिकृत आकडेवारीसह चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वात कमी उपस्थित राहण्याचा एक नवा लाजीरवाणा विक्रम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल देत ठाकरे सभागृहात केवळ ४२ दिवसच फिरकले, त्यांची उपस्थिती जेमतेम ३१.५८ टक्के इतकीच होती. २२ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच उबाठा प्रमुखांचे हे सुमार 'प्रगतीपुस्तक' समोर आल्यामुळे उबाठा गटाची प्रचंड नाचक्की झाली आहे.



उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ नुकताच म्हणजेच १३ मे २०२६ रोजी संपला. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे अनैसर्गिक सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनलेले उद्धव ठाकरे २०२० मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले होते. मात्र, २०२२ मध्ये जवळपास ४० आमदारांनी त्यांच्या नेतृत्वाला कंटाळून उठाव केला आणि त्यांना सत्तेवरून खाली खेचले. मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) असताना ते मंत्रालयात आणि विधिमंडळात कधी जातच नव्हते. मात्र, मुख्यमंत्री पद गेल्यानंतर तरी ते आमदार म्हणून लोकांचे प्रश्न मांडतील, अशी अपेक्षा होती. परंतु, समोर आलेल्या आकडेवारीने त्यांच्या अकार्यक्षम वृत्तीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.



१३३ पैकी तब्बल ९१ बैठकांना गैरहजर :


जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत झालेल्या विधानपरिषदेच्या एकूण १३३ बैठकांपैकी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केवळ ४२ बैठकांनाच हजेरी लावली आहे, तर तब्बल ९१ बैठकांमध्ये ते अनुपस्थित राहिले. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनात तर त्यांनी केवळ एकदाच तोंड दाखवले. एवढेच नव्हे तर, नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील १६ बैठकांपैकी ते केवळ चार बैठकांना उपस्थित होते. जनतेच्या प्रश्नांशी आणि सभागृहाच्या कामकाजाशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, हेच उबाठा प्रमुखांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.



कोणाची किती उपस्थिती?


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी ६ वर्षांच्या कार्यकाळात ९६.५० टक्के उपस्थिती लावून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याशिवाय शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांनी ९३ टक्क्यांहून अधिक बैठकांना हजेरी लावली. विशेष म्हणजे, अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी आपल्या १८ पैकी १३ अधिवेशनांमध्ये १०० टक्के उपस्थितीचा विक्रम केला आहे. (Uddhav Thackeray)

Comments
Add Comment

Ind vs Eng : भारत - इंग्लंड तिसरी ODI किती वाजता सुरू होणार ? कशी असेल लॉर्ड्सची खेळपट्टी ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर

US Visa : एफ-१ आणि जे-१ व्हिसाधारकांसाठी अमेरिकेचे नवे नियम; भारतीय विद्यार्थ्यांची वाढली चिंता

नवी दिल्ली : अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) स्थलांतराशी संबंधित एक नवा आणि कठोर नियम लागू

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून

Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल