Uddhav Thackeray : उबाठा प्रमुखांची विधान परिषदेत महा'दांडी'!

- ४ वर्षांत केवळ ४२ दिवस हजेरी; सभागृहाच्या इतिहासात सर्वात कमी उपस्थितीचा लाजिरवाणा विक्रम नोंद


मुंबई : मुख्यमंत्री असताना 'वर्क फ्रॉम होम' करत केवळ फेसबुक लाईव्ह पुरतेच मर्यादित राहिलेले 'उबाठा' प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभार आता अधिकृत आकडेवारीसह चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वात कमी उपस्थित राहण्याचा एक नवा लाजीरवाणा विक्रम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल देत ठाकरे सभागृहात केवळ ४२ दिवसच फिरकले, त्यांची उपस्थिती जेमतेम ३१.५८ टक्के इतकीच होती. २२ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच उबाठा प्रमुखांचे हे सुमार 'प्रगतीपुस्तक' समोर आल्यामुळे उबाठा गटाची प्रचंड नाचक्की झाली आहे.



उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ नुकताच म्हणजेच १३ मे २०२६ रोजी संपला. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे अनैसर्गिक सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनलेले उद्धव ठाकरे २०२० मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले होते. मात्र, २०२२ मध्ये जवळपास ४० आमदारांनी त्यांच्या नेतृत्वाला कंटाळून उठाव केला आणि त्यांना सत्तेवरून खाली खेचले. मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) असताना ते मंत्रालयात आणि विधिमंडळात कधी जातच नव्हते. मात्र, मुख्यमंत्री पद गेल्यानंतर तरी ते आमदार म्हणून लोकांचे प्रश्न मांडतील, अशी अपेक्षा होती. परंतु, समोर आलेल्या आकडेवारीने त्यांच्या अकार्यक्षम वृत्तीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.



१३३ पैकी तब्बल ९१ बैठकांना गैरहजर :


जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत झालेल्या विधानपरिषदेच्या एकूण १३३ बैठकांपैकी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केवळ ४२ बैठकांनाच हजेरी लावली आहे, तर तब्बल ९१ बैठकांमध्ये ते अनुपस्थित राहिले. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनात तर त्यांनी केवळ एकदाच तोंड दाखवले. एवढेच नव्हे तर, नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील १६ बैठकांपैकी ते केवळ चार बैठकांना उपस्थित होते. जनतेच्या प्रश्नांशी आणि सभागृहाच्या कामकाजाशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, हेच उबाठा प्रमुखांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.



कोणाची किती उपस्थिती?


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी ६ वर्षांच्या कार्यकाळात ९६.५० टक्के उपस्थिती लावून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याशिवाय शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांनी ९३ टक्क्यांहून अधिक बैठकांना हजेरी लावली. विशेष म्हणजे, अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी आपल्या १८ पैकी १३ अधिवेशनांमध्ये १०० टक्के उपस्थितीचा विक्रम केला आहे. (Uddhav Thackeray)

Comments
Add Comment

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Yogi Adityanath : ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)

Mexico Puebla Shooting : मेक्सिकोच्या प्युएब्लामध्ये गोळीबार; एका अल्पवयीन मुलासह १० जणांचा मृत्यू

मेक्सिको : मेक्सिकोमधील पुएब्ला राज्यात झालेल्या भीषण सशस्त्र हल्ल्यात (Mexico Puebla Shooting) किमान १० जणांचा मृत्यू झाला

Badlapur Crime : बदलापूरमधील पीडित चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली!

घोषणेनंतर तब्बल दोन वर्षांनी दहावीपर्यंतचे शुल्क मंजूर; 'आरटीई'अंतर्गत शाळांना थेट निधी देणार मुंबई : संपूर्ण

India - Sweden Bilateral Talks : पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला