Uddhav Thackeray : उबाठा प्रमुखांची विधान परिषदेत महा'दांडी'!

- ४ वर्षांत केवळ ४२ दिवस हजेरी; सभागृहाच्या इतिहासात सर्वात कमी उपस्थितीचा लाजिरवाणा विक्रम नोंद


मुंबई : मुख्यमंत्री असताना 'वर्क फ्रॉम होम' करत केवळ फेसबुक लाईव्ह पुरतेच मर्यादित राहिलेले 'उबाठा' प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभार आता अधिकृत आकडेवारीसह चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वात कमी उपस्थित राहण्याचा एक नवा लाजीरवाणा विक्रम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल देत ठाकरे सभागृहात केवळ ४२ दिवसच फिरकले, त्यांची उपस्थिती जेमतेम ३१.५८ टक्के इतकीच होती. २२ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच उबाठा प्रमुखांचे हे सुमार 'प्रगतीपुस्तक' समोर आल्यामुळे उबाठा गटाची प्रचंड नाचक्की झाली आहे.



उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ नुकताच म्हणजेच १३ मे २०२६ रोजी संपला. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे अनैसर्गिक सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनलेले उद्धव ठाकरे २०२० मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले होते. मात्र, २०२२ मध्ये जवळपास ४० आमदारांनी त्यांच्या नेतृत्वाला कंटाळून उठाव केला आणि त्यांना सत्तेवरून खाली खेचले. मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) असताना ते मंत्रालयात आणि विधिमंडळात कधी जातच नव्हते. मात्र, मुख्यमंत्री पद गेल्यानंतर तरी ते आमदार म्हणून लोकांचे प्रश्न मांडतील, अशी अपेक्षा होती. परंतु, समोर आलेल्या आकडेवारीने त्यांच्या अकार्यक्षम वृत्तीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.



१३३ पैकी तब्बल ९१ बैठकांना गैरहजर :


जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत झालेल्या विधानपरिषदेच्या एकूण १३३ बैठकांपैकी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केवळ ४२ बैठकांनाच हजेरी लावली आहे, तर तब्बल ९१ बैठकांमध्ये ते अनुपस्थित राहिले. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनात तर त्यांनी केवळ एकदाच तोंड दाखवले. एवढेच नव्हे तर, नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील १६ बैठकांपैकी ते केवळ चार बैठकांना उपस्थित होते. जनतेच्या प्रश्नांशी आणि सभागृहाच्या कामकाजाशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, हेच उबाठा प्रमुखांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.



कोणाची किती उपस्थिती?


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी ६ वर्षांच्या कार्यकाळात ९६.५० टक्के उपस्थिती लावून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याशिवाय शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांनी ९३ टक्क्यांहून अधिक बैठकांना हजेरी लावली. विशेष म्हणजे, अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी आपल्या १८ पैकी १३ अधिवेशनांमध्ये १०० टक्के उपस्थितीचा विक्रम केला आहे. (Uddhav Thackeray)

Comments
Add Comment

Mumbai Metro Good News : मुंबईकरांना मोठा दिलासा! अंधेरी-घाटकोपर मार्गावर १० ऑगस्टपासून 'मिक्स्ड-लूप' सेवा; गर्दीच्या वेळी ३ मिनिटांत मेट्रो!

मुंबईतील सर्वात वर्दळीच्या वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर (मेट्रो १) (Andheri to Ghatkopar Metro 1) मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो

Nashik : सुरगाण्यात अत्याधुनिक भूकंप मापन केंद्र कार्यान्वित, भूकंपीय हालचालींवर आता रिअल-टाईम नजर

Nashik : नाशिक जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींवर आता अधिक अचूक आणि प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. राष्ट्रीय भूकंप

IAF Officer Arrest : हनीट्रॅपच्या जाळ्यात वायुसेनेचा विंग कमांडर? संरक्षणविषयक गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोप; Official Secrets Act अंतर्गत कारवाई

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या (IAF) एका कार्यरत विंग कमांडरला संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती कथितरीत्या

Nashik Accident News : देवळा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देवळा-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) जवळ अर्टिगा

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या मतदार यादीत १ लाख ४० हजार ७६६ मृतांची नावे

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात SIR मोहिमेत मोठी आकडेवारी समोर

IIT Bombay Hostel Canteen : आयआयटी बॉम्बेच्या 2 हॉस्टेल मेसला टाळं! FDAची मोठी कारवाई; मुंबईतील 4 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA)