Ahilyanagar : अहिल्यानगरच्या मतदार यादीत १ लाख ४० हजार ७६६ मृतांची नावे

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात SIR मोहिमेत मोठी आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख २६ हजार ११३ मतदार असंकलित आढळून आले आहेत. यामध्ये तब्बल १ लाख ४० हजार ७६७ मतदार मयत, तर ६० हजार ८४१ मतदारांची नावे दुबार असल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित दोन लाखांहून अधिक मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहेत, किंवा त्यांचा शोध बीएलओ आणि त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागलेला नाही. या असंकलित मतदारांचे प्रमाण जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या तुलनेत १२.१८ टक्के आहे. विशेष म्हणजे नगर शहर विधानसभा मतदारसंघात हे प्रमाण सर्वाधिक २२ टक्के, तर अकोला मतदारसंघात सर्वात कमी ५.९३ टक्के आहे.



पाच मतदारसंघाचे ‘एसआयआर’चे काम पूर्ण


जिल्ह्यात एकूण १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी नगर शहर, कर्जत -जामखेड, श्रीरामपूर, शिर्डी व कोपरगाव या पाच मतदारसंघाचे ‘एसआयआर’चे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे, उर्वरित मतदारसंघांचे देखील ९८ टक्के पेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून लवकरच अहिल्यानगर जिल्ह्याचे शंभर टक्के काम पूर्ण होईल असा विश्वास गाढे यांनी व्यक्त केला. दरम्यान ‘एसआयआर’ मोहिमेला निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.



जिल्ह्यात ३८ लाख १० हजार १०२ मतदार


जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एसआयआर’चे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ३८ लाख १० हजार १०२ मतदार आहेत. त्यापैकी असंकलित मतदार संख्या ४ लाख २६ हजार ११३ इतकी आहे. अशा संकलित मतदारांची यादी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकांनाही (बीएलए) त्या देण्यात आल्या आहेत. या याद्यांसंदर्भात राजकीय पक्षाच्या सहाय्यकांबरोबर बैठका घेण्याच्या सूचनाही बीएलओ यांना देण्यात आल्या आहेत.



दावे, हरकतींठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरची मुदत


मतदान केंद्राचे डिजिटायझेशनचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या याद्या स्थानिक स्तरावर, तालुका पातळीवर व जिल्हा स्तरावरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यासंदर्भात दावे, हरकती दाखल करण्यासाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर ही सुधारित मुदत देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत असे दावे व हरकती निकली काढण्यासाठी मुदत असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai Metro Good News : मुंबईकरांना मोठा दिलासा! अंधेरी-घाटकोपर मार्गावर १० ऑगस्टपासून 'मिक्स्ड-लूप' सेवा; गर्दीच्या वेळी ३ मिनिटांत मेट्रो!

मुंबईतील सर्वात वर्दळीच्या वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर (मेट्रो १) (Andheri to Ghatkopar Metro 1) मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो

Nashik : सुरगाण्यात अत्याधुनिक भूकंप मापन केंद्र कार्यान्वित, भूकंपीय हालचालींवर आता रिअल-टाईम नजर

Nashik : नाशिक जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींवर आता अधिक अचूक आणि प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. राष्ट्रीय भूकंप

IAF Officer Arrest : हनीट्रॅपच्या जाळ्यात वायुसेनेचा विंग कमांडर? संरक्षणविषयक गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोप; Official Secrets Act अंतर्गत कारवाई

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या (IAF) एका कार्यरत विंग कमांडरला संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती कथितरीत्या

Nashik Accident News : देवळा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देवळा-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) जवळ अर्टिगा

IIT Bombay Hostel Canteen : आयआयटी बॉम्बेच्या 2 हॉस्टेल मेसला टाळं! FDAची मोठी कारवाई; मुंबईतील 4 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

PM Modi IIT Delhi Convocation : "मी काय बाबा बागेश्वर नाही..."; IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभात PM मोदींचं मिश्कील वक्तव्य

नवी दिल्ली : आयआयटी दिल्ली (IIT Delhi) च्या ५७ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रमुख पाहुणे