Maharashtra's Colleges : महाविद्यालयांमधील 'छुप्या' शुल्क वसुलीला चाप

प्रवेश शुल्काबाबत सर्व माहिती दर्शनी फलकावर लावणे बंधनकारक; लपवाछपवी केल्यास कारवाई


मुंबई : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असतानाच, राज्य सरकारने महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला आणि अवाजवी शुल्क वसुलीला चाप लावला आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील सर्व महाविद्यालयांनी ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर सर्व प्रकारच्या शुल्काची अद्ययावत माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर आणि प्रवेश माहितीपुस्तिकेत स्पष्टपणे नमूद करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.



प्रवेश शुल्काबाबत विद्यार्थ्यांची किंवा पालकांची कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी सर्व विभागीय सहसंचालक आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेलेच शुल्क महाविद्यालयांना आकारता येणार आहे. प्रवेश घेण्यापूर्वीच इच्छुक विद्यार्थ्यांना या शुल्काची संपूर्ण माहिती देणे ही संबंधित महाविद्यालयांची कायदेशीर जबाबदारी असेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.


अनेकदा प्रवेश निश्चित झाल्यानंतर किंवा छुप्या शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक अडवणूक केली जाते. या पार्श्वभूमीवर, "प्रवेश शुल्काबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची सर्वस्वी दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालय प्रशासनाला थेट जबाबदार धरून कारवाई केली जाईल," असा इशारा उच्च शिक्षण संचालनालयाने दिला आहे.




सहसंचालक आणि कुलसचिवांवर जबाबदारी

महाविद्यालयांनी आपल्या सूचना फलकावर आणि माहितीपुस्तकेत शुल्काचा तपशील प्रसिद्ध केला आहे की नाही, हे तपासण्याची आणि त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठांचे कुलसचिव आणि विभागीय सहसंचालक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सर्व संलग्नित महाविद्यालयांना याबाबतचे आदेश तात्काळ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र

Jagar Samatecha : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

मुंबई, दि. २५ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या

Nitesh Rane :चंद्रपूर जिल्ह्यात झिंगे पालन व्यवसायाला मोठी चालना देणार

मुंबई, : चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे