Maharashtra's Colleges : महाविद्यालयांमधील 'छुप्या' शुल्क वसुलीला चाप

प्रवेश शुल्काबाबत सर्व माहिती दर्शनी फलकावर लावणे बंधनकारक; लपवाछपवी केल्यास कारवाई


मुंबई : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असतानाच, राज्य सरकारने महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला आणि अवाजवी शुल्क वसुलीला चाप लावला आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील सर्व महाविद्यालयांनी ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर सर्व प्रकारच्या शुल्काची अद्ययावत माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर आणि प्रवेश माहितीपुस्तिकेत स्पष्टपणे नमूद करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.



प्रवेश शुल्काबाबत विद्यार्थ्यांची किंवा पालकांची कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी सर्व विभागीय सहसंचालक आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेलेच शुल्क महाविद्यालयांना आकारता येणार आहे. प्रवेश घेण्यापूर्वीच इच्छुक विद्यार्थ्यांना या शुल्काची संपूर्ण माहिती देणे ही संबंधित महाविद्यालयांची कायदेशीर जबाबदारी असेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.


अनेकदा प्रवेश निश्चित झाल्यानंतर किंवा छुप्या शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक अडवणूक केली जाते. या पार्श्वभूमीवर, "प्रवेश शुल्काबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची सर्वस्वी दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालय प्रशासनाला थेट जबाबदार धरून कारवाई केली जाईल," असा इशारा उच्च शिक्षण संचालनालयाने दिला आहे.




सहसंचालक आणि कुलसचिवांवर जबाबदारी

महाविद्यालयांनी आपल्या सूचना फलकावर आणि माहितीपुस्तकेत शुल्काचा तपशील प्रसिद्ध केला आहे की नाही, हे तपासण्याची आणि त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठांचे कुलसचिव आणि विभागीय सहसंचालक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सर्व संलग्नित महाविद्यालयांना याबाबतचे आदेश तात्काळ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत

SIR Form : मतदारांसाठी दिलासा! राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra  - SIR) अभियानाला

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)

Maharashtra Rain Update : पावसाचा दमदार कमबॅक! पुण्यासह 'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon) दमदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर सिया गोयलच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; वडिलांच्या दुकानावर 'FDA'ची कारवाई

मुंबई : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Murder Case) आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाशी संबंधित व्यवसायावर अन्न व औषध