Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राज्यभरात तब्बल १ हजार रोजगार मेळावे (Maharashtra Rojgar Melava 2026) आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक पार पडली. यावेळी रोजगार मेळाव्यांच्या नियोजनासह तरुणांपर्यंत रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.



रोजगार मेळावे अधिक व्यापक करण्यावर भर :


मंत्री लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) म्हणाले की, रोजगार मेळाव्यांची (Maharashtra Rojgar Melava 2026) माहिती जास्तीत जास्त गरजू युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. केवळ आयटीआय विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता इतर महाविद्यालयांतील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असलेले तरुण तसेच सामाजिक संस्थांशी संपर्क साधून या उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे.


राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात रोजगार मेळाव्यांची माहिती पोहोचवण्यात येणार असून, युवकांना रोजगारासोबतच स्वरोजगाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येणार आहे.



रोजगारापूर्वी मिळणार कौशल्य प्रशिक्षण :


मंत्री लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी स्पष्ट केले की, केवळ रोजगार मेळावे घेऊन उपयोग होणार नाही, तर उमेदवारांना पूर्वतयारी आणि कौशल्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्यापूर्वी (Maharashtra Rojgar Melava 2026) उमेदवारांना दोन आठवड्यांचे कौशल्य व पूर्व-रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे.


या प्रशिक्षणाच्या पहिल्या आठवड्यात व्यक्तिमत्त्व विकास, शिष्टाचार (एटीकेट), बायोडाटा तयार करणे आणि संभाषण कौशल्य या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. तर दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अ‍ॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट, मार्केटिंग यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. (Maharashtra Rojgar Melava 2026)



निवडीचे प्रमाण वाढवण्याचा उद्देश :


योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास रोजगार मेळाव्यांमधील उमेदवारांच्या निवडीचे प्रमाण वाढेल, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय अधिकारी आणि प्रदेश समन्वय समितीने एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (Maharashtra Rojgar Melava 2026)


दरम्यान, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी रोजगार मेळाव्यांच्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली. समिती सदस्यांनीही रोजगार मेळाव्यांच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सूचना मांडल्या. (Maharashtra Rojgar Melava 2026)

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना

Government Hospital Catering Services : सरकारी रुग्णालयांतील खानपान सेवा आता महिला बचत गटांकडे

- २०० पेक्षा कमी खाटांच्या रूग्णालयांसाठी निर्णय; पारदर्शक गुणांकनाद्वारे जिल्हा स्तरावर निवड होणार मुंबई :

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra : अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्यात बिनसलं? १८ महिन्यांपासून राहतात वेगळे; ११ वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेणार ?

मुंबई : ग्लॅमर आणि झगमगाटाने वेढलेल्या सिनेसृष्टीतील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य खरोखरच तितके सुखी आणि चमकदार