Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, आता रेल्वे प्रवासातील गैरप्रकारांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. धूम्रपान, अनधिकृत प्रवेश, रेल्वेत फेरीवाला व्यवसाय, मद्यपान करून गोंधळ घालणे आणि प्रवासातील असुरक्षित प्रकारांना आळा घालण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. (Central Railway New Rule)


मध्य रेल्वेने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना या सुधारित नियमांची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. सुधारित तरतुदींनुसार काही महत्त्वाचे बदल पुढीलप्रमाणे आहेत.



रेल्वेत धूम्रपान केल्यास आता २ हजार रुपयांचा दंड :


रेल्वे कायद्याच्या कलम १६७ मध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी धूम्रपान केल्यास १०० रुपयांपर्यंत दंड होता. आता हा दंड वाढवून २ हजार रुपये करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित व्यक्तीचे तिकीट किंवा पास जप्त करून त्याला रेल्वे परिसरातून बाहेर काढले जाऊ शकते. दंड भरण्यास नकार दिल्यास न्यायालयाकडून ५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.



मद्यपान आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई : कलम १४५ अंतर्गत मद्यपान करणे central raiकिंवा रेल्वे परिसरात उपद्रव निर्माण करणे यासाठी शिक्षेत बदल करण्यात आला आहे. (Central Railway New Rule)



नवीन नियमानुसार :


रेल्वे परिसरातून बाहेर काढणे, तिकीट किंवा पास जप्त करणे, २४ तासांपर्यंत साधा कारावास, १ हजार रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षा, तसेच 'सामुदायिक सेवा'ची तरतूद करण्यात आली आहे. वारंवार उपद्रव करणाऱ्या व्यक्तींना ६ महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.



अनधिकृत प्रवेशाला बसणार आळा :


कलम १४७ मध्येही बदल करण्यात आले आहेत. रेल्वेच्या प्रवासी क्षेत्रात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांना जागा सोडण्यास नकार दिल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. (Central Railway New Rule)


रेल्वे परिसराचा गैरवापर केल्यास: ३ महिन्यांपर्यंत कारावास, ५ हजार रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, कारवाईपूर्वी प्रथम ताकीद देण्याची तरतूद आहे.



रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्यास दंड :


रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणण्यासंदर्भातील कलम १४६ मध्येही सुधारणा करण्यात आली आहे. आता अशा प्रकारात: ३ महिन्यांपर्यंत कारावास, २ हजार ५०० रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. (Central Railway New Rule)



रेल्वे परिसरात अनधिकृतपणे फेरीवाला व्यवसाय करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाणार आहे, कलम १४४ नुसार:


पहिल्या तीन उल्लंघनांसाठी प्रत्येकी २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंड, चौथ्या आणि त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी १ वर्षापर्यंत कारावास आणि ५ हजार रुपयांपर्यंत दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. धोकादायक वस्तू आणल्यास किमान १० हजारांचा दंड तर
रेल्वेत आक्षेपार्ह किंवा धोकादायक वस्तू बेकायदेशीरपणे आणल्यास कलम १६५ अंतर्गत कारवाई होणार आहे.



नव्या नियमानुसार:


किमान १० हजार रुपये दंड, संबंधित वस्तू जप्त किंवा हटवणे, नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. दंड न भरल्यास न्यायालयाकडून १ वर्षापर्यंत कारावास किंवा किमान १० हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा दिली जाऊ शकते. (Central Railway New Rule)



मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन :


मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे, आरक्षित जागांचा आदर करण्याचे आणि रेल्वे परिसरात शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी अनधिकृत प्रवेश, फेरीवाला व्यवसाय, धूम्रपान आणि इतर असुरक्षित प्रकार टाळून सुरक्षित, सुरळीत आणि सुखकर प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Central Railway New Rule)

Comments
Add Comment

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना