Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal) प्रकल्पाला राज्य सरकारने गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार, व्यापार आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला.


मंत्रालयात भगवती बंदर (Bhagwati Port) येथे क्रुझ टर्मिनल विकसित करण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते (Nitesh Rane) बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, कोकण किनारपट्टीचे नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन क्षमता लक्षात घेता भगवती बंदरातील क्रुझ टर्मिनल हा राज्याच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामुळे देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील आणि रत्नागिरी पर्यटनाच्या जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल.


मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कोकणातील बंदर विकास आणि सागरी पर्यटनाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. भगवती बंदरातील अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलमुळे (cruise terminal) केवळ रत्नागिरीच नव्हे, तर संपूर्ण कोकणच्या पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासाला नवी गती मिळणार आहे. या प्रकल्पातून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हॉटेल व्यवसाय, वाहतूक, पर्यटन मार्गदर्शक, हस्तकला, मत्स्यव्यवसाय आणि लघुउद्योग यांसारख्या विविध क्षेत्रांना थेट लाभ होणार असून स्थानिक उद्योजकांसाठी नव्या व्यवसायाच्या संधीही निर्माण होतील.



मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले की, प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यावरणीय मंजुरीसह इतर आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी (TEFS) पूर्ण झाली असून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.


यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करून प्रकल्पाची अंमलबजावणी गतिमान करण्याच्या सूचना दिल्या. आधुनिक सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समतोल राखत स्थानिक जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन हा प्रकल्प साकारावा, असे निर्देशही त्यांनी (Nitesh Rane) दिले.

Comments
Add Comment

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना

Government Hospital Catering Services : सरकारी रुग्णालयांतील खानपान सेवा आता महिला बचत गटांकडे

- २०० पेक्षा कमी खाटांच्या रूग्णालयांसाठी निर्णय; पारदर्शक गुणांकनाद्वारे जिल्हा स्तरावर निवड होणार मुंबई :

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra : अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्यात बिनसलं? १८ महिन्यांपासून राहतात वेगळे; ११ वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेणार ?

मुंबई : ग्लॅमर आणि झगमगाटाने वेढलेल्या सिनेसृष्टीतील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य खरोखरच तितके सुखी आणि चमकदार

Mumbai Doctors Strike : मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप; ओपीडी बंद, रुग्णांचे हाल सुरू

मुंबई : मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांना मोठा मनस्ताप सहन

Mumbai Attack Threat : मुंबईवर ९ ते १८ ऑगस्टदरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका ? 'एक्स'वरील पोस्टने खळबळ

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून मुंबईसह देशावर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवणारी एक वादग्रस्त