प्रवेश शुल्काबाबत सर्व माहिती दर्शनी फलकावर लावणे बंधनकारक; लपवाछपवी केल्यास कारवाई
मुंबई : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असतानाच, राज्य सरकारने महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला आणि अवाजवी शुल्क वसुलीला चाप लावला आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील सर्व महाविद्यालयांनी ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर सर्व प्रकारच्या शुल्काची अद्ययावत माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर आणि प्रवेश माहितीपुस्तिकेत स्पष्टपणे नमूद करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
अबू धाबी : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्याची सुरुवात अत्यंत दिमाखदार आणि ऐतिहासिक पद्धतीने झाली आहे. ...
प्रवेश शुल्काबाबत विद्यार्थ्यांची किंवा पालकांची कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी सर्व विभागीय सहसंचालक आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेलेच शुल्क महाविद्यालयांना आकारता येणार आहे. प्रवेश घेण्यापूर्वीच इच्छुक विद्यार्थ्यांना या शुल्काची संपूर्ण माहिती देणे ही संबंधित महाविद्यालयांची कायदेशीर जबाबदारी असेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
अनेकदा प्रवेश निश्चित झाल्यानंतर किंवा छुप्या शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक अडवणूक केली जाते. या पार्श्वभूमीवर, "प्रवेश शुल्काबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची सर्वस्वी दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालय प्रशासनाला थेट जबाबदार धरून कारवाई केली जाईल," असा इशारा उच्च शिक्षण संचालनालयाने दिला आहे.
मुंबई : विरारला राहणारे ५३ वर्षीय शेखर बाबुराव रवते गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. घरातून निघताना त्यांनी ...






