नागपूर : नागपूर शहरात गुरुवारी (७ मे) दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसाने आणि वेगवान वादळी वाऱ्यांनी जनजीवन विस्कळीत झाले. या खराब हवामानाचा मोठा फटका विमानसेवेलाही बसला. विशेषतः IndiGo च्या बेंगळुरू–नागपूर विमानाला नागपूर विमानतळावर उतरणे शक्य न झाल्याने ते रायपूरकडे वळवण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे फ्लाइट क्रमांक 6E 6003 हे विमान बेंगळुरू येथून दुपारी ३.३५ वाजता उड्डाण झाले होते. नियोजित वेळेनुसार हे विमान सायंकाळी ४.०७ वाजता नागपूरमध्ये दाखल होणार होते. मात्र, विमान नागपूरच्या हवाई क्षेत्रात पोहोचताच अचानक जोरदार पाऊस आणि वाऱ्यांचा वेग वाढला. हवामान सतत खराब होत असल्याने वैमानिकाने काही काळ विमान हवेतच घिरट्या घालत परिस्थिती नियंत्रणात येण्याची वाट पाहिली.
Team India new coach : गौतम गंभीर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, शेवटी...
भारतीय क्रिकेट विश्वातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघ हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहेच पण भारतीय संघाच्या कामगिरीत आणखी सुधावरणा ...
तथापि, धावपट्टीवरील दृश्यमानता कमी होणे, वाऱ्यांचा वेग आणि सुरक्षेच्या निकषांचा विचार करून अखेर विमान रायपूर विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान सुरक्षितपणे रायपूर येथे उतरल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रवाशांना नंतर पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.
या हवामान बदलाचा परिणाम केवळ एका उड्डाणापुरता मर्यादित राहिला नाही. नागपूर विमानतळावरील इतर अनेक उड्डाणे उशिराने धावली. Star Air चे नागपूर–नांदेड विमान तब्बल सहा तास उशिराने रवाना झाले. तसेच नागपूर–नवी मुंबई आणि नागपूर–हैदराबाद या इंडिगोच्या विमानांना जवळपास एक तास विलंब झाला, तर नागपूर–पुणे उड्डाण सुमारे ५० मिनिटे उशिराने निघाले.
Sanjay Shirsat Criticized Imtiaz Jaleel : “निदा खानला इम्तियाज जलील यांचा आश्रय”; मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल
मुंबई : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खान (Nida Khan) हिला अखेर ...
विमानतळ प्रशासनाने सांगितले की, खराब हवामानामुळे सुरक्षेला प्राधान्य देत काही उड्डाणांचे वेळापत्रक बदलावे लागले. अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे अनेक प्रवाशांना विमानतळावरच थांबावे लागले. काही प्रवाशांनी विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली, तर काहींनी सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगितले.
दरम्यान, नागपूर शहरातील अनेक भागांत जोरदार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. हवामान खात्याने पुढील काही तासांत विदर्भातील काही भागांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.