Friday, May 8, 2026

सूर्यकुमार यादव कर्णधारपदापासून मुकणार; कोण बनणार भारताचा नवीन कर्णधार, बीसीसीआयची महत्तवाची अपडेट..

सूर्यकुमार यादव कर्णधारपदापासून मुकणार; कोण बनणार भारताचा नवीन कर्णधार, बीसीसीआयची महत्तवाची अपडेट..

BCCI UPDATE : आयपीएल सुरु आसतानाच भारतीय क्रिकेट नियमक मंडळ (बीसीसीआयने) मोठी अपडेट दिली आहे. यात बीसीसीआयने थिंक-टँकला सुर्यकुमार यादवच्या खराब फॉर्म बदद्ल नाराजी व्याक्त केली आहे . सुर्यकुमार यादवने २०२६ च्या टी- २० विश्व चषकात भारताचे नेत्तृतव केले होते. मात्र पुर्ण विश्व चषकात धावांच्या बाबतीत तो फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. संपुर्ण विश्व चषकात फक्त अमेरिका विरुद्धच्या सामन्यात त्याने मोठी धावसंख्या केली, पण महत्तवाच्या सामन्यांमध्ये तो अपेक्षीतप्रमाणे चांगली कामगिरी करु शकला नाही .

मिळालेल्या माहितीनुसार, सुर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममागे त्याच्या उजव्या मनगटाची दुखापत मानली जात आहे. मागील काही महिन्यांपासुन तो मनगटावर टेप बांधुन खेळत आहे. मुंबईसाठी खेळताना तो दुखापत असल्याचे दिसुन आले आहे. २०२६ च्या विश्व चषका दरम्यान, नेट सेशनपूर्वी डॉक्टर टीमकडुन त्याच्य मनगटावर विशेष पॅडिंग केली जात होती. सुरुवातीला टीम मॅनेजमेंटने याकडे सामन्य थकवा म्हणून पाहिले होते. मात्र आता या दुखापतीलमुळे सुर्याच्या फलंदाजीवर प्रभाव पडल्याचे दिसुन येत आहे. त्याने २०२४ पासुन भारताच्या टी-२० संघाची धुरा संभाळ्या पासुन फलंदाजीत चांगली कामगिरी करु शकला नाही.

भारताचा नवीन कर्णधार कोण ?

सूत्रांच्या महितीनुसार बीसीसीआय २०२८ ऑलिम्पिक आणि टी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता. नव्या नेतृत्वाच्या शोधात असल्याचं बोललं जात आहे. सर्याचा वाढता वय आणि फिटनेसची समस्या मुळे तो कर्णधार पदा पासुन मुकु शकतो. नवीन कर्णधारपदाच्या शर्यतीत श्रेयस अय्यरचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचं समोर येत आहे . त्याला केवळ संघात पुनरागमनाची नव्हे तर थेट कर्णधारपदाची संधी देणयात येऊ शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा