उत्तर प्रदेश : मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेनच्या संदर्भात महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. स्वयंचलित दरवाजे असलेली साधी लोकल आता चाचणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, मुंबईच्या गजबजलेल्या मार्गांवर धावण्याआधी या लोकलची चाचणी सध्या उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा देशातील पहिलाच असा प्रयोग मानला जात आहे. या उपक्रमामागे लोकल प्रवासातील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याचा मोठा उद्देश रेल्वे प्रशासनाने ठेवला आहे.
CBSE Schools : सरकारी शाळा 'सीबीएसई' करण्याचा वाद तीव्र; राज्य शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुंबई : राज्यातील सरकारी शाळांचे ‘सीबीएसई’करण करण्याचा निर्णय सध्या वादाचा विषय ठरत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ...
उत्तर भारतातच चाचणी का?
मुंबई उपनगरी रेल्वे मार्ग हा देशातील सर्वाधिक व्यस्त मार्गांपैकी एक मानला जातो. दिवसभरात हजारो गाड्यांची ये-जा आणि प्रचंड गर्दीमुळे नव्या तंत्रज्ञानाची सखोल आणि अचूक चाचणी करणे येथे अत्यंत कठीण ठरते. विशेषतः रात्रीच्या मर्यादित वेळेत सर्व तांत्रिक बाबी तपासणे शक्य होत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या नव्या लोकलचा दुसरा रेक थेट उत्तर प्रदेशातील झाशी विभागात पाठवण्याचा निर्णय घेतला.
Solapur College of Engineering : आदिवासी आश्रमाशाळांची श्रेणीवाढ
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; सोलापूर आणि तुळजापूरमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग मोकळा
मुंबई : आदिवासी बांधवांच्या पाल्यांच्या शैक्षणिक ...
सध्या खजुराहो-महोबा या सुमारे ६३.२७ किलोमीटरच्या तुलनेने कमी वर्दळीच्या मार्गावर ही चाचणी सुरू आहे. या मार्गावर वाहतूक कमी असल्यामुळे कोणत्याही अडथळ्यांशिवाय तांत्रिक निरीक्षणे, वेगवेगळ्या परिस्थितींतील कामगिरी आणि सुरक्षेचे पैलू बारकाईने तपासता येत आहेत.
बंद दरवाज्यांमुळे हवा कशी खेळती राहणार?
एसी लोकलप्रमाणेच या नव्या साध्या लोकलमध्येही स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे असणार आहेत. मात्र, एसी नसलेल्या डब्यांमध्ये प्रवाशांना पुरेशी हवा मिळणे हे सर्वात मोठे आव्हान ठरते. यासाठी चेन्नई येथील आयसीएफ कारखान्यात तयार करण्यात आलेल्या या रेकमध्ये विशेष व्हेंटिलेशन प्रणाली बसवण्यात आली आहे.
छतावर बसवलेले शक्तिशाली ब्लोअर्स, फोर्स्ड व्हेंटिलेशन सिस्टिम, खास डिझाइन केलेले लूव्हर दरवाजे आणि मोठ्या आकाराच्या खिडक्या यासर्वांमुळे डब्यांमध्ये हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटणार नाही, याची खात्री करण्यासाठी या सर्व यंत्रणांची सध्या कसून चाचणी घेतली जात आहे.
नाशिक : पिकअप आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार
नाशिक : वडाळा नाका परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पिकअप आणि दुचाकीच्या झालेल्या या भीषण अपघातात एक जण ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई ...
सुरक्षेसाठी अत्याधुनिक बदल
या नव्या लोकलचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची इंटरलॉकिंग सुरक्षा प्रणाली. या प्रणालीमुळे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय लोकल सुरू होणार नाही. मुंबईत गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर होणारी चढ-उताराची धावपळ, प्रवाशांच्या सवयी, तसेच दरवाजे उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी लागणारा वेळ या सर्व घटकांचा विचार करून चाचण्या केल्या जात आहेत.
या तंत्रज्ञानामुळे धावत्या लोकलमधून पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियंत्रित होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पावसाळ्याचा विचार करून खास तयारी
मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेला अनेकदा अडथळे निर्माण होतात. हे लक्षात घेऊन या नव्या लोकलमध्ये अँटी-वॉटर इन्ग्रेस प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचले तरी ते डब्यांमध्ये शिरू नये, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या सर्व टप्प्यांतील चाचण्या यशस्वी झाल्यानंतर हा रेक पुन्हा मुंबईत आणला जाणार आहे. त्यानंतर अंतिम चाचण्या पूर्ण झाल्यावर ही अत्याधुनिक लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.