Nitesh Rane : प्रशासकीय गतिमानतेत मंत्री नितेश राणेंच्या खात्याचा पहिला क्रमांक

 मत्स्यव्यवसाय विभागाच्या उपक्रमांना राज्यस्तरीय ‘प्रगती’ पुरस्कार; ‘ड्रोन’ गस्त आणि कृत्रिम भित्तिका प्रकल्प ठरले अव्वल


मुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कृत्रिम भित्तिकांच्या माध्यमातून मत्स्यसंपदेचे संवर्धन करणाऱ्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या दोन महत्त्वाकांक्षी उपक्रमांनी राज्य सरकारचा मानाचा ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६’ पुरस्कार पटकावला आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतून राबविण्यात आलेल्या ‘ड्रोन आधारित देखरेख’ यंत्रणेला प्रथम, तर क्षेत्रीय कार्यालयांच्या श्रेणीत ‘शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास’ उपक्रमाला अव्वल स्थान मिळाले आहे.



राज्यातील किनारपट्टीवर होणारी अवैध मासेमारी आणि घुसखोरी रोखण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने जानेवारी २०२५ पासून ड्रोन गस्त सुरू करण्यात आली होती. या प्रणालीमुळे अरबी समुद्रातील हालचालींवर नियंत्रण मिळवणे सुलभ झाले आहे. विशेषतः एलईडी दिव्यांचा वापर करून केली जाणारी बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी रोखण्यात या तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे. या यशामुळे मत्स्यव्यवसाय विभागाची प्रशासकीय गतिमानता सिद्ध झाली असून, त्याला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.



‘शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास व मत्स्यसंपदेचे संरक्षण’ या उपक्रमांतर्गत अरबी समुद्र किनारपट्टीवरील १८२ गावांमध्ये कृत्रिम भित्तिका उभारण्यात आल्या आहेत. या भित्तिकांमुळे माशांसाठी सुरक्षित प्रजनन अधिवास निर्माण झाला असून, ५० मीटरचे संरक्षण क्षेत्र विकसित झाले आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम मत्स्योत्पादनावर झाला असून, उत्पादनात तब्बल २९ हजार किलोची वाढ नोंदवली गेली आहे.



पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ


या कृत्रिम भित्तिकांच्या देखभालीसाठी स्थानिक मच्छीमार सहकारी संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय, समुद्रातील प्लास्टिक कचरा आणि ‘घोस्ट नेट’ संकलनावरही भर देण्यात आला आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असून सागरी पर्यावरणाचे रक्षण झाले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाने ड्रोन तंत्रज्ञान आणि डिजिटल डेटा मेंटनन्समध्ये केलेले काम कौतुकास्पद आहे. या यशामुळे मच्छीमार बांधवांची आर्थिक उन्नती आणि सागरी सुरक्षेला बळ मिळाले आहे. या यशाचे श्रेय विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मच्छीमार बांधवांचे आहे. - नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास

Comments
Add Comment

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)

Maharashtra Rain Update : पावसाचा दमदार कमबॅक! पुण्यासह 'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon) दमदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर सिया गोयलच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; वडिलांच्या दुकानावर 'FDA'ची कारवाई

मुंबई : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Murder Case) आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाशी संबंधित व्यवसायावर अन्न व औषध

BMC News : कोविड काळातील ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा गेली कुठे? , स्थायी समिती सदस्यांचा प्रशासनाचा सवाल

माहिती सादर करण्याचे अध्यक्षांचे निर्देश मुंबई : कोविड काळामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी

Malaria and Dengue : मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे थैमान, मलेरिया ३,६८१, डेंग्यू ९३८, लप्टोच्या १५७ रुग्णांची नोंद!

एडिस व अनोफिलीस डासांच्या २७ हजारांहून अधिक आळ्या सापडल्या ३६ लाख ८१ हजार लोकांचा सर्वे, १० लाखांहून अधिक

Mumbai Illegal Debris : अनधिकृत डेब्रीजबाबत दिल्ली पॅटर्न, इमारत बांधकामाचे डेब्रीज आता थेट सी अँड प्रकल्पातच जाणार

अनधिकृत डेब्रीज वाहणाऱ्या डंपरवर होणार कारवाई स्थायी समितीत प्रस्तावाला दिली मंजुरी मुंबई : मुंबई (Mumbai) शहरात