Nitesh Rane : ‘प्रगती’ अभियानात संयुक्त सागरी व्यवस्थापनाची राज्यात छाप: मंत्री नितेश राणे यांचे कौतुक

मुंबई : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६ अंतर्गत “सर्वोत्तम कल्पना” म्हणून संयुक्त सागरी व्यवस्थापन प्रकल्पाने राज्यात विशेष ठसा उमटवला आहे. अरबी समुद्रात प्रथमच जनसहभागातून मत्स्यसंपदेचे संवर्धन व संरक्षण करण्याचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याची दखल या अभियानात घेतली गेली आहे.





या प्रकल्पांतर्गत किनारपट्टीवरील गावांमध्ये कृत्रिम भित्तिका (Artificial Reefs) उभारण्यात आल्या असून, त्यांची देखभाल करण्यासाठी स्थानिक सहकारी संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. नवोन्मेष, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग यांचा संगम असलेल्या या उपक्रमामुळे राज्यात शाश्वत मत्स्यव्यवसायाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.यामुळे स्थानिक मच्छीमारांना या उपक्रमात सक्रिय सहभाग मिळाला आहे.



माशांच्या प्रजननासाठी सुमारे ५० संरक्षण क्षेत्रे निर्माण करण्यात आली असून, “हक्काचे घर” संकल्पनेद्वारे मत्स्यसंपदेचे नैसर्गिक संवर्धन साधले जात आहे. यासोबतच किमान पकड आकार (MLS) नियमांचे पालन, दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण आणि समुद्रातील प्लास्टिक कचरा संकलन अशा विविध उपक्रमांमुळे सागरी पर्यावरण संतुलन राखण्यास मदत झाली आहे.



या प्रकल्पाचा थेट फायदा पारंपारिक मच्छीमारांना झाला असून, त्यांना मोठ्या प्रमाणात व गुणवत्तापूर्ण मासेमारी मिळू लागली आहे. परिणामी सागरी मत्स्योत्पादनात तब्बल २९ हजार किलोची वाढ नोंदवली गेली आहे, ज्यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

ओला, उबर आणि रॅपिडोचे ॲप प्ले-स्टोअरवरून हटवा

परिवहन विभागाचे महाराष्ट्र सायबर विभागाला आदेश; बेकायदेशीर बाईक टॅक्सींवर आतापर्यंतची सर्वात मोठी

शहरांमधील बांधकाम आणि पाडकामाच्या ढिगाऱ्यांवर आता सरकारचा 'वॉच'!

 राज्यस्तरीय सनियंत्रण समिती स्थापन; नियम मोडणाऱ्या विकासकांवर फौजदारी कारवाई मुंबई : इमारतींच्या

Vasai Shocker : पैशांच्या वादातून विवाहित प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या; मृतदेह निळ्या ड्रममध्ये कोंबला अन्...वसई हादरली!

वसई : पैशांच्या हव्यासापोटी प्रेमाचा किती भयंकर शेवट होऊ शकतो, याचा थरकाप उडवणारा प्रकार वसईत उघडकीस आला आहे. एका

Monsoon Update : केरळमध्ये ५ दिवस आधीच मान्सूनची एन्ट्री; मुंबई-कोकणात मे महिन्याच्या अखेर पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी

Mumbai Janganana : मुंबईकर गावाला, घराला टाळी आणि बंद घराची पाहणी करायला येणार जनगणनेचे कर्मचारी?

घरयादी व घरगणना मोहिमेला शनिवार पासून प्रारंभ, सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आयुक्तांचे नागरिकांना आवाहन मुंबई

Old Birth and Death records : जन्म-मृत्यू नोंदी, विवाह नोंदी यांसारखे जुने अभिलेख अवघ्या काही सेकंदात उपलब्ध होणार

महानगरपालिका अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचा पुढाकार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्‍या ई प्रशासकीय