मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे अभिनंदन करत त्यांचे आभार मानले आहेत.
मुंबई उच्च न्यायालय; डीपफेक व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना निर्देश मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, ५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दृढ संकल्पामुळे कलम ३७० आणि ३५A हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भारताची एकता, अखंडता आणि संवैधानिक समानता अधिक मजबूत झाली.
- २०० पेक्षा कमी खाटांच्या रूग्णालयांसाठी निर्णय; पारदर्शक गुणांकनाद्वारे जिल्हा स्तरावर निवड होणार मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ...
मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) आणि लडाखमधील नागरिकांसाठी सुशासन, शांतता, समान अधिकार आणि सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. तसेच, 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करणारा हा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले.
फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुढे सांगितले की, कलम ३७० हटवण्याचा निर्णय हा आजही राष्ट्रीय एकात्मता, संविधानिक समानता आणि सक्षम भारताचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या परिवर्तनकारी निर्णयासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांचे अभिनंदन केले.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके दूरदर्शी नेतृत्व एवं मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके दृढ़ संकल्प ने 5 अगस्त 2019 को अनुच्छेद 370 और 35A को समाप्त कर भारत की एकता, अखंडता और संवैधानिक समानता को नई शक्ति प्रदान की थी।
यह ऐतिहासिक निर्णय जम्मू-कश्मीर और… pic.twitter.com/HndL6hZUQW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 5, 2026