नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री शिवाजी नगर परिसरात भरधाव वेगात असलेली कार अचानक अनियंत्रित होऊन पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तब्बल ९ जणांचा, त्यात ७ ते १४ वयोगटातील सहा लहान मुलांचाही समावेश असून, दुर्दैवी मृत्यू झाला.
इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका स्नेहसंमेलनाहून परतत असताना रात्री सुमारे १० वाजता हा अपघात घडला. कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन थेट विहिरीत जाऊन बुडाले. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र अंधार आणि खोल पाण्यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा आला.
View this post on Instagram
या घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि एनडीआरएफ (National Disaster Response Force) चे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आली, परंतु तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, अपघातामागील नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.






