मुंबई : मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता उपनगरी रेल्वे व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. विशेषतः ऑफिसच्या वेळेत लोकल गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी ही प्रवाशांसाठी मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून १५ डब्यांच्या लोकल गाड्यांचा विस्तार करण्याची तयारी सुरू आहे.
गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
पायाभूत कामांना वेग
१५ डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या स्थानकांवर फलाटांचा विस्तार केला जात आहे. याशिवाय रुळांमध्ये सुधारणा, ओव्हरहेड वायरचे काम आणि सिग्नल प्रणाली अद्ययावत करण्याचे कामही सुरू आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच १५ डब्यांच्या लोकल गाड्या या मार्गावर नियमितपणे धावू शकतील.
डिसेंबर २०२६पर्यंत काम होईल पूर्ण
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे सर्व काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर वांद्रे स्थानकावरून १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे प्रवाशांची गर्दी विभागण्यास मदत होईल
प्रवाशांना दिलासा मिळणार
या प्रकल्पामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या वेळेत होणारी चेंगराचेंगरी आणि असुविधा कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे.






