स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी अजय किसन पाटील आणि स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपदी संगीता शर्मा तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुरेश आवळे यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही समित्यांमध्ये प्रतिस्पर्धी पक्षाने उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे या अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.


स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्यावतीने यामिनी जाधव तर उपाध्यक्षपदी भाजपच्यावतीने अजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. तर प्रतिस्पर्धी पक्षाकडून दोन्ही पदांसाठी एकही अर्ज न आल्यामुळे गुरुवारी झालेल्या या निवडणुकीत त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. स्थापत्य समिती (शहर) उप सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाचे अजय किसन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून रितू तावडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी स्थापत्य समिती (शहर) सदस्यांसह प्रमुख अभियंता (पर्यावरण व वातावरणीय बदल) प्रदीप गवळी, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.


तर महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (उपनगरे) सभापती पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या संगीता शर्मा यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्थापत्य समिती (उपनगरे) उप सभापती पदासाठी शिवसेना पक्षाचे सुरेश आवळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. यावेळी स्थापत्य समिती (उपनगरे) सदस्यांसह प्रमुख अभियंता (पर्यावरण व वातावरणीय बदल) प्रदीप गवळी, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी

स्थायी समितीच्या सभांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स हद्पार

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आता कारभारात अमुलाग्र बदल केला जात असून सभा बैठकीमध्ये