Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास नगरसेवकावर कारवाई होऊ शकते, तर मग अशा अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्यास अथवा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल करत स्थायी समितीने अनधिकृत बांधकामांप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.


मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उबाठाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. मुंबईतील अनधिकृत बांधकामांमुळे एक दिवस नगरसेवकाच्या जिवालाच धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली. अनधिकृत बांधकामांबाबत जो नियम नगरसेवकांना आहे, तो नियम अधिकाऱ्यांना आहे का असा सवाल केला.आम्ही लोकप्रतिनिधींनी जर अनधिकृत बांधकामांची तक्रार केली तरी महापालिकेचे अधिकारी हे संबंधित अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना आमचे नाव पुढे करतात आणि ती व्यक्ती आमच्या दारावर उभी राहते. वर्सोव्यात अशाप्रकारे अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. आणि त्यांना पाण्याची जोडणीही देण्यात आली आहे. मग याला जबाबदार कोण असा सवाल केला.


यावर महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी फणसे यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असून याची प्रशासनाला दखल घ्यावी लागणार आहे. दहिसरचे गणपत पाटील नगर असाे वा मालाड मालवणी असो वा कुर्ला असो आदी ठिकाणी जी अनधिकृत बांधकामे झाली ती अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय झाली नाही. वळणाई नाल्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमणे आहेत. अनधिकृत बांधकामांची तक्रार केली तर अशी बांधकामे करणारे नगरसेवकांच्या दारात उभे राहतात. त्यामुळे स्थायी समितीला कुठे तरी यावर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. असे सांगत जो अधिकारी अशाप्रकारच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देतो त्याची ग्रॅज्युएटी आणि पेन्शन रोखा. त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी खणकर यांनी केली.


यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर किंवा त्यांनी अनधिकृत बांधकाम केले असेल तर त्यांना अपात्र ठरवले जाते. तर मग हाच न्याय महापालिकेच्या अधिकाऱ्यांना का नाही ? त्यामुळे अशा सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची स्थायी समितीची मागणी आहे. हा विषय गंभीर आहे. अधिकाऱ्यांच्या या वृत्तीमुळे नगरसेवकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अधिकारी हे लाभार्थी धोरण अवलंबवत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी अशा अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई करायला हवी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनानला दिले.

Comments
Add Comment

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील