भीम ॲपवर मागील वर्षी मासिक व्यवहारांमध्ये चौपट वाढ

मुंबई : २०२५ हे वर्ष भारतातील डिजिटल पेमेंट्ससाठी मैलाचा दगड ठरले असून, भीम पेमेंट्स ॲपने यावर्षी वापरात (अभूतपूर्व) चौपट वाढ नोंदवली आहे. एनपीसीआय भीम सर्व्हिसेस लिमिटेडने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये ३८.९७ दशलक्ष असलेले मासिक व्यवहार डिसेंबरमध्ये थेट १६५.१ दशलक्षांवर पोहोचले असून, ही वाढ ३०० टक्क्यांहून अधिक आहे. वर्षभरात सरासरी मासिक वाढ सुमारे १४ टक्के राहिली, ज्यामुळे युपीआय-आधारित डिजिटल पेमेंट्समध्ये भीम ॲपची भूमिका अधिक ठळक झाली आहे.


व्यवहारांच्या संख्येबरोबरच त्यांच्या मूल्यामध्येही मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये भीम अॅपवरील व्यवहारांचे एकूण मूल्य २० हजार ८५४ कोटी रुपयांवर पोहोचले. यावरून वापरकर्ते आता केवळ छोट्या दैनंदिन पेमेंट्सपुरते मर्यादित न राहता मोठ्या रकमेचे व्यवहारही भीमद्वारे करत असल्याचे स्पष्ट होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत व्यवहार संख्येत जवळपास ३९० टक्के तर व्यवहार मूल्यात १२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.


या वाढीत दिल्ली आघाडीवर राहिली आहे. राष्ट्रीय राजधानीत छोट्या रकमेचे, वारंवार होणारे व्यवहार, किराणा खरेदी आणि पीअर-टू-पीअर पेमेंट्स यामुळे भीम ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. एकूण व्यवहारांपैकी २८ टक्के पीअर-टू-पीअर तर १८ टक्के किराणा खरेदीशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. यावरून भीम अॅप दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालल्याचे चित्र स्पष्ट होते.


भीम ॲपमधील ही वाढ भारताच्या डिजिटल इंडिया मोहिमेला नवी गती देणारी ठरत आहे. छोट्या शहरांपासून ते महानगरांपर्यंत ॲपची पोहोच वाढत असून, भविष्यात युपीआय इकोसिस्टिममध्ये भीमची भूमिका अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वापरकर्त्यांच्या वाढत्या विश्वासामुळे डिजिटल पेमेंट्सचा प्रसार वेगाने होत असून, भारत डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करत आहे.

Comments
Add Comment

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या विधानावर भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा जो दुर्दैवी व

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

शरद पवार राज्यसभेसाठी पुन्हा रिंगणात?

मविआ'चे अस्तित्व लागणार पणाला; सातपैकी सहा जागांवर महायुतीचे वर्चस्व शक्य मुंबई (सुहास शेलार) : राज्यातील

काँग्रेसकडून शिवछत्रपतींची तुलना क्रूरकर्मा टिपू सुलतानाशी- प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे अकलेचे तारे; हजारो मंदिरांचा विध्वंस करणाऱ्या टिपू सुलतानाला ठरवले शिवरायांच्या समकक्ष

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान शौर्याचा आणि त्यांनी निर्माण

चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे जर-तरवर चर्चा करण्यात अर्थ नाही; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

मुंबई : विलीनीकरणाच्या चर्चेवर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही भावना व्यक्त केली. अनेकांनी

शशिकांत शिंदेचा जाहीर निषेध; शशिकांत शिंदेनी दादांच्या कुटुंबाची माफी मागावी - आनंद परांजपे

अजितदादा काय कारणाने पक्षातून बाहेर पडले याची अत्यंत खोटी,चुकीची,दिशाभूल करणारी माहिती त्या