उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण आशान

उल्हासनगर : महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत लागलेल्या चढाओढीमध्ये अखेर शिवसेनेने बाजी मारली आहे. कोकण भवन येथे झालेल्या अधिकृत नोंदणीत शिवसेनेने ४० नगरसेवकांचे संख्याबळ दाखवून बहुमताचा आकडा पार केला. शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण आशान यांची नियुक्ती झाली असून यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


उल्हासनगर महापालिकेत सत्तेसाठी ४० या जादूई आकड्याची गरज होती. निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. महापालिकेत भाजप-३७, शिवसेना-३६, वंचित बहुजन, आघाडी- २, साई पक्ष-१, काँग्रेस-१, अपक्ष -१ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडे ३७ नगरसेवक असल्याने ते सत्तेच्या जवळ होते, मात्र शिवसेनेने अत्यंत प्रभावीपणे इतर छोट्या पक्षांना आणि अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले.


शिवसेनेचे- ३६, वंचित बहुजन आघाडीचे २, साई पक्षाचा १ आणि १ अपक्ष यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. या युतीमुळे शिवसेनेचे एकूण संख्याबळ ४० वर पोहोचले आहे. कोकण भवन येथे या ४० नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी शिवसेना म्हणून करण्यात आली, अशी माहिती नवनिर्वचित गटनेते अरुण आशान यांनी दिली. या सर्व घडामोडींनंतर अरुण आशान यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. महापालिकेत पक्षाची ध्येयधोरणे राबवणे आणि ४० नगरसेवकांच्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असणार आहे.


महापौरपदाचा मार्ग मोकळा


भाजप ३७ जागांवर अडकल्याने आणि शिवसेनेने बहुमताचा ४०चा आकडा गाठल्याने आता उल्हासनगरच्या महापौरपदावर शिवसेनेचा दावा भक्कम झाला. यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागण्याची शक्यता असून शहरात आता शिवसेनेची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच