पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पाडा आणि पी अँड टी कॉलनी परिसरात मागील तब्बल २५ दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याच्या निषेधार्थ शेकडो महिला-पुरुष नागरिकांनी आज सकाळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.


नांदिवली पाडा, पी अँड टी कॉलनीसह साई दर्शन नक्स १, साई दर्शन नक्स, साई दर्शन, बालाजी, गुरू दर्शन, लक्ष्मण निवास आदी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प आहे. यापूर्वी काही दिवस अत्यल्प दाबाने पाणी येत होते; मात्र गेल्या २५ दिवसांपासून परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या पाणीटंचाईमुळे महिला, वृद्ध, लहान मुले यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पाणी हा मूलभूत हक्क असून नियमित पुरवठा मिळणे अत्यावश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


महापालिकेकडून ५०० रुपये आकारून टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. मात्र हे पाणी अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक असल्याने अनेक नागरिक व लहान मुले आजारी पडल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात दीड महिना परिसरात फूल प्रेशरने पाणी मिळत होते. मात्र निवडणूक संपताच पाणीपुरवठा कमी झाला आणि अखेर बंदच झाला. “हा केवळ निवडणुकीचा जुमला होता का?” असा गंभीर सवाल नागरिकांनी उपस्थित केला.


मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मळेकर यांनी सांगितले की, संबंधित भाग शहराच्या टोकाला असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा दाब वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सध्याच्या घडीला टँकरमार्फत पाणीपुरवठा करून नागरिकांची तात्पुरती गरज भागविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी या मोर्चात राजाराम कोचरेकर, गिरीश गावकर, संदेश नारकर, संजय परब, अमोल राउत, अमित पवार, सुहास गावडे, संकेत गांगण आदींसह रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

Kalyan : लोकलच्या छतावर जीवघेणा स्टंट; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ

कल्याण : ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाण्याची वेळ आणि कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यानची रेल्वे वाहतूक खोळंबली, कारण

First Electric Double-Decker Bus : ठाणेकरांच्या सेवेत पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल; 'तीन हात नाका ते गायमुख' मार्गावर धावणार!

ठाणे : ठाणेकरांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आणि वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणारा आहे. ठाणे

Maharashtra Din 2026 : ठाण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

ठाणे : महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे

Shivsena Latur : लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी गर्दी, राज्यभरातून शिवसेनेचा वाढतोय

Eknath Shinde : पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचे आडाखे बांधून काँग्रेसची देशद्रोही मानसिकता उघडी पडली!

देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी काँग्रेसवर शिंदेंची सडकून टीका ठाणे : अमेरिकेचे

“इंटिग्रेटेड ग्राम विकास मॉडेल”ची मांडणी; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील १०० तलाव गाळमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी सामाजिक संस्था आणि