पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पाडा आणि पी अँड टी कॉलनी परिसरात मागील तब्बल २५ दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याच्या निषेधार्थ शेकडो महिला-पुरुष नागरिकांनी आज सकाळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.


नांदिवली पाडा, पी अँड टी कॉलनीसह साई दर्शन नक्स १, साई दर्शन नक्स, साई दर्शन, बालाजी, गुरू दर्शन, लक्ष्मण निवास आदी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प आहे. यापूर्वी काही दिवस अत्यल्प दाबाने पाणी येत होते; मात्र गेल्या २५ दिवसांपासून परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या पाणीटंचाईमुळे महिला, वृद्ध, लहान मुले यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पाणी हा मूलभूत हक्क असून नियमित पुरवठा मिळणे अत्यावश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


महापालिकेकडून ५०० रुपये आकारून टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. मात्र हे पाणी अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक असल्याने अनेक नागरिक व लहान मुले आजारी पडल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात दीड महिना परिसरात फूल प्रेशरने पाणी मिळत होते. मात्र निवडणूक संपताच पाणीपुरवठा कमी झाला आणि अखेर बंदच झाला. “हा केवळ निवडणुकीचा जुमला होता का?” असा गंभीर सवाल नागरिकांनी उपस्थित केला.


मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मळेकर यांनी सांगितले की, संबंधित भाग शहराच्या टोकाला असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा दाब वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सध्याच्या घडीला टँकरमार्फत पाणीपुरवठा करून नागरिकांची तात्पुरती गरज भागविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी या मोर्चात राजाराम कोचरेकर, गिरीश गावकर, संदेश नारकर, संजय परब, अमोल राउत, अमित पवार, सुहास गावडे, संकेत गांगण आदींसह रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

LPG Scam : पोलिसांनी उधळला LPG सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा डाव

ठाणे : पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून देशात ठिकठिकाणी एलपीजी सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून

Sahar Shaikh MIM Mumbra : अब कैसे लटकाया...! एक नाही तर ४ शासकीय कार्यालयांना बाप-लेकीनं लावला चुना; पण आता...?

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांना

Sahar Shaikh Mumbra AIMIM : कैसा हराया... एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख गोत्यात! बनावट जात दाखल्याने पालिकेची खुर्ची धोक्यात ?

ठाणे : जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ज्यांच्या 'कैसा हराया...' या डायलॉगची चर्चा

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Kanjur Marg to Badlapur Metro : लवकरच धावणार शहरातील सर्वात लांब मेट्रो; बदलापूरकरांना होणार फायदा

मुंबई : संपूर्ण मुंबईत मेट्रो आपले जाळे विणत चाललं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा दररोजचा प्रवास हा सुखकर आणि

Mumbai Metro 5 : भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो; 'ऑरेंज मेट्रो लाइन ५' साठी नवी डेडलाईन जाहीर!

ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती