पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पाडा आणि पी अँड टी कॉलनी परिसरात मागील तब्बल २५ दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याच्या निषेधार्थ शेकडो महिला-पुरुष नागरिकांनी आज सकाळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.


नांदिवली पाडा, पी अँड टी कॉलनीसह साई दर्शन नक्स १, साई दर्शन नक्स, साई दर्शन, बालाजी, गुरू दर्शन, लक्ष्मण निवास आदी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प आहे. यापूर्वी काही दिवस अत्यल्प दाबाने पाणी येत होते; मात्र गेल्या २५ दिवसांपासून परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या पाणीटंचाईमुळे महिला, वृद्ध, लहान मुले यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पाणी हा मूलभूत हक्क असून नियमित पुरवठा मिळणे अत्यावश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


महापालिकेकडून ५०० रुपये आकारून टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. मात्र हे पाणी अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक असल्याने अनेक नागरिक व लहान मुले आजारी पडल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात दीड महिना परिसरात फूल प्रेशरने पाणी मिळत होते. मात्र निवडणूक संपताच पाणीपुरवठा कमी झाला आणि अखेर बंदच झाला. “हा केवळ निवडणुकीचा जुमला होता का?” असा गंभीर सवाल नागरिकांनी उपस्थित केला.


मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मळेकर यांनी सांगितले की, संबंधित भाग शहराच्या टोकाला असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा दाब वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सध्याच्या घडीला टँकरमार्फत पाणीपुरवठा करून नागरिकांची तात्पुरती गरज भागविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी या मोर्चात राजाराम कोचरेकर, गिरीश गावकर, संदेश नारकर, संजय परब, अमोल राउत, अमित पवार, सुहास गावडे, संकेत गांगण आदींसह रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

Bakrid 2026 : किरीट सोमय्यांचा थेट इशारा; "मीरा रोडच्या नया नगरमध्ये 'नवा पाकिस्तान' करू पाहणाऱ्यांना खपवून घेणार नाही!

मीरा भाईंदर : आगामी बकरी ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर मुंबई नजीकच्या मीरा रोड (Meera Road) येथील पूनम सोसायटीमध्ये (Poonam Society)

Kalyan Murder Case : कल्याण हादरलं! रविवारी एकत्र सिनेमा, सोमवारी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; बापानंच विवाहित मुलीची हत्या केली?

Kalyan : कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी परिसरात एका पित्यानेच आपल्या पोटच्या विवाहित मुलीची धारदार शस्त्राने वार

Kharbao Business Park : खारबाव बिझनेस पार्क'चा विस्तार

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशाचा संतुलित आणि आर्थिक विकास साधण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला

Dombivli Marriage News : कोर्ट मॅरेजनंतर घरच्यांनी लग्न लावून देण्याचं दिलं आश्वासन; दुसऱ्याच दिवशी नवरी बेपत्ता

डोंबिवली : प्रेमविवाहाला (Love Marriage) कुटुंबियांचा विरोध, घरच्यांच्या नाराजीमुळे दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न करणं,

Dombivli News : डोंबिवलीतील लोढा पलावा क्राऊन सिटीत पोलिसांचा छापा; २५ आफ्रिकन नागरिक ताब्यात

डोंबिवली : नवी मुंबई (Navi Mumbai) आणि ठाणे (Thane) पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या ‘ऑपरेशन गरुड ३’ अंतर्गत शनिवारी पहाटे

Mumbai Central Railway Delay : पहाटेच्या पावसामुळे खडवली-टिटवाळा दरम्यान पॉवर कट; मध्य रेल्वेची वाहतूक होती ठप्प, सकाळी ६ नंतर गाड्या सुरू

टिटवाळा : मध्य रेल्वेच्या (Central Railway) खडवली (Khadavli) ते टिटवाळा (Titwala) स्थानकांदरम्यान रविवारी (२४ मे) पहाटे सुमारे ४.३० वाजता