पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पाडा आणि पी अँड टी कॉलनी परिसरात मागील तब्बल २५ दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याच्या निषेधार्थ शेकडो महिला-पुरुष नागरिकांनी आज सकाळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.


नांदिवली पाडा, पी अँड टी कॉलनीसह साई दर्शन नक्स १, साई दर्शन नक्स, साई दर्शन, बालाजी, गुरू दर्शन, लक्ष्मण निवास आदी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प आहे. यापूर्वी काही दिवस अत्यल्प दाबाने पाणी येत होते; मात्र गेल्या २५ दिवसांपासून परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या पाणीटंचाईमुळे महिला, वृद्ध, लहान मुले यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पाणी हा मूलभूत हक्क असून नियमित पुरवठा मिळणे अत्यावश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


महापालिकेकडून ५०० रुपये आकारून टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. मात्र हे पाणी अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक असल्याने अनेक नागरिक व लहान मुले आजारी पडल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात दीड महिना परिसरात फूल प्रेशरने पाणी मिळत होते. मात्र निवडणूक संपताच पाणीपुरवठा कमी झाला आणि अखेर बंदच झाला. “हा केवळ निवडणुकीचा जुमला होता का?” असा गंभीर सवाल नागरिकांनी उपस्थित केला.


मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मळेकर यांनी सांगितले की, संबंधित भाग शहराच्या टोकाला असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा दाब वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सध्याच्या घडीला टँकरमार्फत पाणीपुरवठा करून नागरिकांची तात्पुरती गरज भागविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी या मोर्चात राजाराम कोचरेकर, गिरीश गावकर, संदेश नारकर, संजय परब, अमोल राउत, अमित पवार, सुहास गावडे, संकेत गांगण आदींसह रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Thane Crime : निर्दयीपणाचा कळस; साडेतीन वर्षांच्या मुलाला गरम उलथण्याने दिले चटके

Thane News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी कासारवडवलीत वाहतूक बदल; ६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मार्ग बंद

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या

Dombivli News : कोट्यवधींच्या प्रकल्पामुळे ५० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ; डोंबिवलीतील दोन इमारती धोक्यात

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आणि एका खासगी कंपनीच्या

Uday Samant : ठाणे अंतर्गत मेट्रोसाठी नागरिकांना विश्वासात घेणार

एक महिन्याच्या आत संयुक्त बैठक घेण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन मुंबई : ठाणे शहरासाठी प्रस्तावित