ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून ठाणे जिल्ह्यातील २३ नागरिक सध्या दुबई येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व नागरिक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते आणि नियोजित वेळेनुसार आज भारतात परतणार होते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा रद्द झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे. अडकलेल्या प्रवाशांमध्ये कल्याण, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील नागरिकांचा समावेश असून २३ जणांपैकी १२ जण ज्येष्ठ नागरिक आहेत. परतीचा प्रवास असल्याने त्यांच्या जवळील आर्थिक तरतूद संपल्याची माहिती समोर येत आहे. हॉटेल खर्च आणि इतर आवश्यक खर्च भागविणे कठीण झाल्याने त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.


हे सर्व नागरिक सध्या दुबईतील ए-१ फहादी स्ट्रीटवरील ‘ग्रँड अॅस्टोरिया’ हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत आहे. अडकलेल्या रमेश धलपे यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी संपर्क साधून सुरक्षित परतीची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर संदेश व्हायरल झाल्यानंतर शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी संबंधित कुटुंबांची माहिती घेण्यासाठी तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र, या प्रकरणी नातेवाईकांनी अद्याप तहसील कार्यालय किंवा पोलिस प्रशासनाशी अधिकृत संपर्क साधलेला नसल्याचे समजते.


सध्याच्या घडीला सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असले, तरी परतीच्या प्रवासाबाबत अनिश्चितता कायम आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणावे, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Zakir Naik : 'त्या' महिलांना दाखवले झाकीर नाईकचे व्हिडीओ, TCS मधील धक्कादायक प्रकार

 मुंबई : नोकरीच्या ठिकाणी दबाव टाकून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी टीसीएसच्या नाशिक

Sunetra Pawar : बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा...

मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश मुंबई:-

Crime News : परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई : पुणे शहरात नुकतीच घडलेली विषारी दारू दुर्घटना लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध आणि बनावट

Manipur : मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, महिलेसह तिघांची हत्या

कांगपोकपी : मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यातील सैतु-गाम्फाजोल उपमंडळातील लोइबोल खुल्लेन गावात शुक्रवार ५ जून

Mantri Nitesh Rane : 'देवभाऊ'च कोकणच्या चित्रपटाचे डायरेक्टर!

मंत्री नितेश राणे; 'त्यांनी दिलेल्या जबाबदारीची मी केवळ अंमलबजावणी केली' मुंबई : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

Crime News : करणीच्या संशयातून रक्तरंजित हल्ला, शेजारी दांपत्यावर कुऱ्हाडीने वार

डहाणू : अंधश्रद्धेच्या विळख्यातून डहाणू तालुक्यातील सरावली पाटीलपाडा येथे घडलेल्या भीषण घटनेने परिसर हादरला