काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये थंड हवेची ठिकाण पर्यटकांनी फुलतात. ज्यात महाराष्ट्रातील महाबळेश्वर, माथेरान आणि महाराष्ट्राबाहेर मनाली, काश्मीर या ठिकाणांना पर्यटकांची विशेष पसंती असते. याप्रमाणेच अनेकजण खास काश्मीरमधील गुलमर्गला भेट देतात. मात्र तुम्ही आता गुलमर्गला भेट द्यायचे नियोजन करत असाल तर तुम्ही गुलाबी नव्हे, तर जीवघेण्या थंडीचा अनुभव घ्याव. कारण, गुलमर्गचे तापमान विक्रमी घटले असून पारा उणे २ अंश सेल्सिअसवर घसरला आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काश्मीर खोऱ्यात ३० डिसेंबरपासून अतिबर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


मागील २४ तासात जम्मू आणि काश्मीरच्या बहुतेक भागांमध्ये हवामान कोरडे होते. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. उत्तर काश्मीरमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट असलेल्या गुलमर्गमध्ये सर्वाधिक थंडी होती. गुलमर्गमध्ये पारा उणे २ अंशावर घसरला असून पहलगाममध्ये किमान तापमान ०.४  अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. श्रीनगर शहरात किमान तापमान ३ अंश सेल्सिअस होते. विशेष म्हणजे हे आतापर्यंतचं विक्रमी कमी तापमान असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या श्रीनगर केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.




काश्मीर खोऱ्यात थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काश्मीर खोऱ्याच्या इतर भागातही रात्री मोठी थंडी जाणवत आहे. यात कुपवाड्यात १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर काझीगुंडमध्ये १.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जम्मूमध्ये किमान तापमान तुलनेने जास्त होते. जम्मू शहरात ९.१ अंश सेल्सिअस आणि कटरा इथे ९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. तर आज दुपारपासून खोऱ्यात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. ज्यात झोजिला आणि द्रास परिसरात हलकी बर्फवृष्टी होऊ शकते. ३० ते ३१ डिसेंबरला काश्मीर खोऱ्यात हलकी ते मध्यम बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.मैदानी भागात बर्फवृष्टीची शक्यता कमी असली तरी, रात्री पर्जन्यवृष्टी कायम राहिल्यास काही सखल भागात हलक्या बर्फवृष्टीची शक्यता ४० टक्के आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

Comments
Add Comment

१ एप्रिलपासून जनगणना २०२७ चा पहिला टप्पा सुरू

नवी दिल्ली : देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून १ एप्रिलपासून या

जम्मू-कश्मीरमध्ये बर्फवृष्टी

राष्ट्रीय महामार्ग बंद, २० हून अधिक उड्डाणे रद्द श्रीनगर : जम्मू विभागातील उंच भागांमध्ये शुक्रवारी जोरदार

उष्णतेत वाढ, पावसात घट? एल निनोमुळे मान्सून धोक्यात

जूननंतर एल निनो सक्रिय होण्याची शक्यता नवी दिल्ली : देशात यंदाच्या मान्सूनबाबत चिंताजनक चिन्हे दिसून येत आहेत.

कर्नाटकात बाईक टॅक्सीला उच्च न्यायालयाकडून परवानगी

बंगळूरु : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी बाईक टॅक्सी चालविण्यास परवानगी दिली, तर बाईक टॅक्सी अॅग्रीगेटर्स,

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र