LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगमधील अंतर २१ दिवसांवरून वाढवून २५ दिवस इतके केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता एक गॅस बुकिंग केल्यापासून २४ दिवसांनी दुसरा गॅस बुकिंग करता येणार आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, हा निर्णय गॅसचे ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. सरकारने मात्र सध्या देशात एलपीजी, पेट्रोल किंवा डिझेलची कमतरता नसल्याचे स्पष्ट केलं आहे.



आधी १५ दिवसांवरून २१ दिवस, आता २५ दिवस



पेट्रोलियम मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडर बुकिंगमधील अंतर १५ दिवसांवरून २१ दिवस केले होते. परंतु आता हा कालावधी आणखी वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दोन बुकिंगदरम्यान किमान २४ दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे.


एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) च्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये आता १४.२ किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलेंडर ९१३ रुपयांना मिळत आहे. याआधी त्याची किंमत ८५३ रुपये होती. तर मुंबईमध्ये ही किंमत ९१२ रुपये इतकी आहे.



मोठ्या शहरांमधील एलपीजीचे दर



मुंबई: ९१२.५०


कोलकाता:९३९


चेन्नई: ९२८.५०


एलपीजी गॅसमधील ही नवीन दरवाढ ७ मार्चपासून लागू झाली आहे.



व्यावसायिक सिलेंडरही महाग



हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या कॉमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ११४.५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आता या सिलेंडरची किंमत १,८८३ रुपये झाली आहे. या वर्षात आतापर्यंत कॉमर्शियल एलपीजीच्या दरात ३०२.५० रुपयांची वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य