गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात एटीएस पथकाने छापेमारी करुन तब्बल २२ किलो ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणात एटीएसच्या पथकाने तीन आरोपींना रंगेहात पकडल्याने आरोपींना अटक करण्यात आली आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी या ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकून अल्प्राझोलम प्रिक्युसर केमिकल्स प्रकारचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे. गुजरात एटीएसच्या पथकाने राजस्थानमधील ड्रग्ज कारखान्यावर केलेल्या छापेमारीत अंशुल अनिल कुमार शास्त्री, अखिलेश कुमार पारसनाथ मौर्य, कृष्ण कुमार श्री यादव अशी अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज तस्करांची नावे आहेत.


गुजरात एटीएस पथकाने राजस्थान एसओजी, जयपूर आणि स्थानिक पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये राजस्थानमधील खैरथल-तिजारा जिल्ह्यातील भिवाडी इथे एका औषध कारखान्यावर छापा टाकला. केली. गुजरात एटीएसनं खैरथल-तिजारा येथील भिवाडी गावात असलेल्या एपीएल फार्मा कंपनीवर हा छापा टाकला आहे. या कारखान्यातून तब्बल २२ किलो बेकायदेशीरपणे उत्पादित सायकोट्रॉपिक ड्रग्ज जप्त करण्यात आले. या छाप्यादरम्यान अल्प्राझोलम प्रिक्युसर केमिकल्स आणि अर्धप्रक्रिया केलेले ड्रग्ज देखील जप्त करण्यात आले.




राजस्थानमधील एका पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ आणि २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात एटीएसने संयुक्त पद्धतीने केलेल्या छापेमारीनंतर संबंधित ठिकाणी पुर्णपणे शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या तस्करांचा आंतरराज्यीय संबंधांचा संशय एटीएसच्या पथकाला आहे. दरम्यान, जप्त केलेला ड्रग्जसाठा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. आंतरराज्यीय संबंधांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुजरात एटीएसने राजस्थानात छापेमारी केल्याने स्थानिक पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. या तस्करांचे इतर राज्यात धागेदोरे असल्याचा संशय एटीएसच्या पथकाला आहे.


या महिन्याच्या सुरुवातीला, गुजरात एटीएसने राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मेफेड्रोन उत्पादन रॅकेटचा पर्दाफाश केला होता, मोठ्या प्रमाणात द्रव ड्रग्ज जप्त केले होते आणि अनेक आरोपींना अटक केली होती.

Comments
Add Comment

सोमनाथ महोत्सवात काय म्हणाले PM Modi ?

सोमनाथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोमनाथ मंदिरात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात सहभाग घेतला.

West Bengal : पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयाने 'शांतीदूतांना' धक्का ?

कोलकाता : पश्चिम बंगालमार्गे भारतामध्ये बिनबोभाट घुसखोरी अनेक वर्षे सुरू होती. पण भाजपच्या नेतृत्वात सरकार

Narendra Modi : पुढील एक वर्ष सोने खरेदीला 'ब्रेक' द्या...पंतप्रधान मोदींच्या आवाहनामागील नेमके गणित काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी १० मे २०२६ रोजी हैदराबाद (Hydrabaad) येथे एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना एक

Rajnath Singh : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार अ‍ॅलर्ट मोडवर; राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दीड तास बैठक

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील (पश्चिम आशिया) वाढत्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत असताना, भारत सरकारने

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा: राहुल गांधींवर बोचरी टीका; म्हणाले त्यांची समजच...

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे सध्या दिल्लीच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर असून,

Bharath Kanth : ३१ वर्षीय उदयोन्मुख तेलगू अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू; हैदराबाद मधील आउटर रिंग रोडवर ट्रकला कारची धडक

हैदराबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख अभिनेता भरत कांत (Bharath Kanth) याचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू