Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशभरात 'अत्यावश्यक वस्तू कायदा' अर्थात ESMA लागू केला आहे. होर्मुझ जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचललं आहे. एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोलियम उत्पादनांची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात ESMA म्हणजेच 'अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा' लागू केला आहे.


केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रुग्णालये आणि घरगुती वापरासाठी लागणारा गॅस वेळेवर उपलब्ध होईल. तसंच टंचाईच्या अफवा पसरवून साठेबाजी करणाऱ्यांवरही आता सरकारची करडी नजर असणार आहे. तेल कंपन्यांना इतर उत्पादने कमी करून केवळ एलपीजी उत्पादनावर भर देण्याचे आदेश या कायद्यांतर्गत दिले गेले आहेत. सरकारनं रिफायनरी कंपन्या, पेट्रोलियम कंपन्यांना निर्देश देत त्यांना LPG चे उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.



'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?


पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी समिती
जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
घरगुती गॅसच्या बुकिंगचा कालावधी वाढवला
२१ दिवसांऐवजी आता २५ दिवसांनंतर बुकिंग
ओटीपी आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सक्तीचं
तेल कंपन्यांना एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आदेश



गॅसची कपात कुठे?


मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री - ८० टक्के
फर्टिलायझर कंपन्या - ७० टक्के
ऑईल रिफायनरी - ६५ टक्के



तेल आणि गॅस आयातीचे नवीन स्रोत


मध्य पूर्वेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊर्जेची उपलब्धता राखण्यासाठी भारत ४० हून अधिक देशांकडून तेल आणि गॅस आयात पर्यायांचा शोध घेत असल्याचे सरकारने म्हटले आहे. भारताकडे अंदाजे आठ आठवड्यांचे तेल साठे आहेत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्चा तेल आयातदार आहे आणि त्याच्या एकूण तेलाच्या गरजांपैकी सुमारे 85-90 टक्के तेल परदेशातून मिळते. भारताच्या तेल आयातीचा मोठा भाग आखाती देशांमधून येतो. अलिकडच्या वर्षांत भारताने जोखीम कमी करण्यासाठी आपली रणनीती बदलली आहे. देशाने रशिया, अमेरिका आणि आफ्रिकन देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी देखील वाढवली आहे.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या