ठाण्यात भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या वाटाघाटी

भाजपची ५० जागांची मागणी


ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील जागावाटपाची दुसरी महत्त्वाची फेरी शुक्रवारी पार पडली. काही जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत साधले गेले असले तरी महत्त्वाच्या प्रभागांवर मोठ्या वाटाघाटी सुरू असल्याचे समोर आले आहे. भाजपने ५० जागांची मागणी केली असल्याने युतीचा अंतिम फॉर्म्युला ठरवण्यात पेच निर्माण झाला आहे. माहितीनुसार, भाजपने मध्यवर्ती भागासह वागळे इस्टेट, वर्तकनगर आणि लोकमान्यनगर यांसारख्या महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये अधिक जागांची मागणी केली आहे. सध्या भाजपकडे महापालिकेत २४ नगरसेवक आहेत, निवडणुकीत आपला विस्तार वाढवण्यासाठी त्यांनी थेट ५० जागांचा आकडा मागितला आहे.


दुसरीकडे शिंदे सेनेकडे सद्यस्थितीत ७९ नगरसेवकांचे बलाढ्य संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला ५० जागा मिळणे म्हणजे शिंदे गटासाठी विद्यमान जागांवर पाणी सोडण्यासारखे होईल, असे स्थानिक नेते मानतात. बैठकीत काही जागांवर जोरदार दावे-प्रतिदावे झाल्याचे समजते. हा तिढा आता वरिष्ठ पातळीवर सोडवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाकडून खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, पूर्वेश सरनाईक, हणमंत जगदाळे तर भाजपकडून आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, शहर अध्यक्ष संदीप लेले आणि संजय वाघुले उपस्थित होते.


आमदार संजय केळकर म्हणाले, "जागावाटपाची दुसरी फेरी पूर्ण झाली असून कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजून घेत आहोत. राज्य सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि महायुतीचा भगवा फडकवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. येत्या एक-दोन दिवसांत सर्व प्रश्न सुटतील." खासदार नरेश म्हस्के म्हणाले, "महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहोत. सोमवारपर्यंत जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर होईल." आमदार निरंजन डावखरे यांनीही सांगितले, "आमच्यात कोणीही मोठा किंवा लहान भाऊ नाही, आम्ही 'जुळे भाऊ' आहोत. आगामी निवडणुकीत महायुतीचे ११० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास आहे."


राजकीय वर्तुळाचे लक्ष आता सोमवारी होणाऱ्या अंतिम जागावाटपावर लागले आहे, ज्यामध्ये भाजपच्या मागितलेल्या ५० जागांपैकी प्रत्यक्षात किती त्यांना मिळतात आणि शिंदे गट आपले बालेकिल्ले कसे राखतो, हे ठरणार आहे.

Comments
Add Comment

एसी ऑफिस सोडून मातीच्या गोण्या उचलल्या!

मोखाडा गटविकास अधिकाऱ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान मोखाडा : सरकारी योजना केवळ कागदावर किंवा आदेशापुरत्या

तलावपाळीवर नववर्षाचे स्वागत गंगा आरतीने !

३१ डिसेंबरच्या रात्री कार्यक्रम; वाराणसीहून पंडितांना आमंत्रण ठाणे : ठाणे शहर येत्या नवीन वर्षाच्या

अंबरनाथमध्ये २०८ बोगस मतदार !

भाजपचा शिवसेनेच्या शिंदे गटावर आरोप, पोलीस चौकशी सुरू अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान खळबळजनक

Mira-Bhayandar Leopard Attack : होणाऱ्या नवरीवर बिबट्याची झडप: चेहऱ्यावर गंभीर जखमा अन्…नेमकं काय घडलं त्या घरात? मीरा भाईंदर हादरलं!

मीरा भाईंदर : पुणे आणि नागपूरनंतर आता मुंबईलगतच्या मीरा भाईंदर शहरात बिबट्याच्या वावराने मोठी खळबळ उडाली आहे.

पुलाच्या कामामुळे कल्याणमध्ये वाहतूक मार्गात २० दिवस बदल , वालधुनी उड्डाणपुलावर काम सुरू

कल्याण : कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्र मार्गे अमेरिकेसाठी रवाना - पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्याची पणन व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधायुक्त करण्यासाठी शासन