बदलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

बदलापूर  : ''माझ्या नेत्याला जर कोणत्या पदावरून राजीनामा द्यावा लागत असेल, तर त्यांच्या सन्मानार्थ मीसुद्धा शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.'' ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बदलापूर शहर अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह आता उघड झाला आहे. काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी वरिष्ठ नेतृत्वावर थेट गंभीर आरोप करून राजीनामा दिला.


त्यांचे समर्थन करत काँग्रेसचे बदलापूर शहर अध्यक्ष संजय जाधव यांनीदेखील राजीनामा दिला आहे. जाधव यांनी आरोप केला आहे की ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निर्णयात प्रदेश पातळीवरील सामील करून घेतले नाही. प्रदेश पातळीवर पैसे घेऊन पदे विकण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू असून व्यापार होत आहे. सध्याच्या काळात काँग्रेसचे अस्तित्वही जाणवत नाही त्यामुळे काँग्रेसची लोक पक्ष सोडून इतर ठिकाणी जाताना दिसतात अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली.


महाविकास आघाडी कुणाची तरी सुपारी घेऊन काम करत आहे


कुळगाव – बदलापूर नगर परिषद निवडणुकीत २४ प्रभागांमध्ये आठ पक्ष मिळून आघाडी केली होती. त्यातील २३ जागांवर एकमत झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कधी आम्ही दोन पावले मागेही आलो; परंतु काँग्रेसचा पारंपरिक असलेल्या बदलापूर गाव या वाॅर्डात आमच्या सीटवर उबाठाने दावा केला आहे. वास्तविक पाहता नगराध्यक्ष पद उबाठा किंवा मनसे यांनी घ्यावे असे आमचे ठरले होते.


४८ नगरसेवकांमध्ये एकही नगरसेवक मुस्लीम नसेल, तर यांना फक्त मुस्लिमांची मते हवी आहेत का हा चुकीचा मेसेज जाईल तसेच याचा परिणाम निवडणुकांवर होईल. या ठिकाणी चारही पक्षाची ताकद सारखीच आहे कोणाची कमी, किंवा कोणाची जास्त नाही आणि जर कोणाची जास्त असेलच तर ते वैयक्तिक निवडणुका लढले नाही. त्यामुळे कुणाची तरी सुपारी घेऊन काम करण्याचे काम महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.