मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल


कर्जत : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत - सीएसएमटी (मुंबई सीएसएमटी किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई) मार्गावरील लोकलसेवा कोलमडली आहे. वांगणी आणि शेलू दरम्यान एक मालगाडी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आहे. यामुळे कर्जतहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लोकल रखडल्या आहेत.


आज शुक्रवार आहे. कामकाजाचा दिवस आहे आणि गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक स्टेशनांवर प्रचंड गर्दी झाली आहे. प्रवाशांचा सकाळीच खोळंबा झाला आहे. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी विलंब होत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत मध्य रेल्वे ही सर्वात मोठी लोकल सेवा आहे. यात मध्य रेल्वे मुख्य मार्ग तसेच मध्य रेल्वे हार्बर मार्ग, मध्य रेल्वे ट्रान्स हार्बर मार्ग, मध्य रेल्वे नेरुळ - उरण मार्ग हे येतात. मध्य रेल्वेच्या १८१० फेऱ्यांमधून दररोज सुमारे ४० लाख नागरिक घर ते कामाचे ठिकाणी असा प्रवास करतात. सकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांची संख्या प्रचंड मोठी असते. यामुळेच गर्दीच्या वेळी कर्जत - सीएसएमटी मार्गावर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत.


Comments
Add Comment

'विकास आणि संस्कृतीला समान महत्त्व देत कार्य करणार'

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो-कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणार

लातूरमध्ये नगरपंचायत निवडणुकीत शिउबाठाला मोठा धक्का; ११ उमेदवारांनी घेतली माघार

लातूर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण गोंधळले

भारताच्या मुलींनी सलग दुसर्‍यांदा जिंकला कबड्डी वर्ल्डकप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबरचा महिना भारतीय महिला खेळाडू गाजवताना दिसत आहेत. २ नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत

पाकिस्तानच्या शेजाऱ्याने दिली गोल्डन ऑफर

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

आम्ही लाखो मशिदी उभारू, MIM चे असदुद्दीन ओवैसी फुत्कारले

नवी दिल्ली : जोपर्यंत हे जग आहे, जगाचं अस्तित्व आहे. तोपर्यंत मुसलमान राहणार. आम्ही लढत राहू. आम्ही लाखो मशिदी

१२ वर्षांचा दुरावा संपला; दानवे–लोणीकर पुन्हा एकत्र, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

जालना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना जालना जिल्ह्यातील एक मोठी राजकीय घडामोड